शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नळांपर्यंत पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 22:53 IST

येलदरी येथून शहरातील जलकुंभात दाखल झालेले पाणी चाचणीच्या निमित्ताने नळाद्वारे शहरवासियांच्या घरात पोहचले आहे. रविवारी महानगरपालिकेने नवीन योजनेच्या जलवाहिनीची चाचणी घेतली असून दर्गारोड परिसरातील अनेक भागात येलदरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता तरी नळ जोडणीचे प्रमाण वाढेल, अशी मनपाला अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येलदरी येथून शहरातील जलकुंभात दाखल झालेले पाणी चाचणीच्या निमित्ताने नळाद्वारे शहरवासियांच्या घरात पोहचले आहे. रविवारी महानगरपालिकेने नवीन योजनेच्या जलवाहिनीची चाचणी घेतली असून दर्गारोड परिसरातील अनेक भागात येलदरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता तरी नळ जोडणीचे प्रमाण वाढेल, अशी मनपाला अपेक्षा आहे.युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजेनेतून परभणी शहरात उभारलेली पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतर पूर्णत्वाला गेली आहे. या योजनेवर नागरिकांनी नळ जोडणी घेतल्यानंतर शहराल पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र महिनाभरापासून नळ जोडणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची स्थिती आहे.मनपा प्रशासनाने आवाहन करुनही नागरिक जोडणी घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. साधारणत: ८०० ते ९०० अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. मात्र नवीन नळ जोडणीचा आकडा १५ ते २० पर्यंतच पोहचला आहे. शहरवासियांनी नळ जोडणीसाठी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने रविवारी मनपाने दर्गारोड भागातील अनेक वसाहतींना नव्या योजनेतून पाणीपुरवठा केला.थेट येलदरी येथून जलवाहिनीद्वारे आलेले पाणी नागरिकांच्या नळापर्यंत पोहचती करण्यात आले. या माध्यमातून मनपाने जलवाहिनीची चाचणीही घेतली आणि नागरिकांना नियमित, मूबलक पाणी मिळणार असल्याची शाश्वती दिली आहे. रविवारी दर्गारोड परिसरातील वसाहतींबरोबरच गंगाखेड रोडवरील अनेक वसाहतींमध्ये या योजनेचे पाणी पोहचती करण्यात आले. त्यामुळे आता नव्या योेजनेवर नळ जोडणी घेण्यास पुढाकार घेतील, अशी अपेक्षा मनपा प्रशासनाला आहे.सद्यस्थिती : २० दिवसांतून एक वेळा पाणी४शहरात सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र या योजनेची जलवाहिनी कुचकामी ठरत आहे. पाण्याचा दाब सहन न झाल्याने ती जागोजागी फुटत असून पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.४नागरिकांचा पाणीपुरवठ्यासंदर्भातील अनुभव फारसा चांगला नाही. त्याचाही परिणाम नळ जोडणीवर होत आहे. नियमित आणि दररोज पाणीपुरवठा होईल का, याची शाश्वती नसल्यानेच नागरिक जोडणी घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे मनपाने दोन दिवसांपूर्वी नळांना पाणी सोडून चाचणी घेण्याबरोबरच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.महिनाभरापासून जलकुंभात पाणी४युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत शहरात १६ नवीन जलकुंभ वाढले आहेत. महिनाभरापूर्वी येलदरी येथील पाणी जलकुंभात येऊन पोहचले आहे. जलकुंभांची चाचणीही पूर्ण झाली आहे.४नागरिकांनी पुरेशा प्रमाणात नळ जोडणी घेतल्यानंतर त्या त्या झोनवरुन नवीन योजनेचे पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन नळ जोडणी आणि जुन्या नळधारकांची जोडणी अधिकृत करण्याच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी