शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

परभणी : जलशुद्धीकरण यंत्र आठ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:26 IST

येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.पाथरी पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीत ग्रामीण भागातील ग्रामस्थांना व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर आणि जलशुद्धीकरण यंत्राची सुविधा एक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आली होती. पंचायत समितीमध्ये विविध योजनांची माहिती व योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे त्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे; परंतु, गेल्या आठ दिवसांपासून हे यंत्र किरकोळ दुरुस्तीअभावी बंद असल्याने कर्मचारी व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.सर्वांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ते नादुरुस्त झाले आहे. दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले असून दोन दिवसांत हे यंत्र सुरू होईल.-बी.टी. बायस, बीडीओ,पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई