शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

परभणी : महिन्यातून दोन वेळाच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:24 IST

शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे.शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुधारले नाही. शहरवासियांना १२ ते १३ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता १५ दिवसाआड होत आहे. त्यामुळे महिनाभरात केवळ दोन वेळा नळाद्वारे पाणी येत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. पाण्याचे रोटेशन अधिक कालावधीचे असल्याने नागरिकांना पावसाळ्यातही पाण्याचा साठा करुन ठेवावा लागत आहे.शहरातील पाणीपुरवठा योजना जुनी असून शहरवासियांना या योजनेद्वारे मुबलक पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणे ही बाब समजण्याजोगी आहे. मात्र पावसाळ्यातही शहरात अनेक भागात १५ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.विशेष म्हणजे शहरातील अनेक भागात जलवाहिनीला गळती लागली आहे. देशमुख हॉटेल, कारेगावरोड परिसरात नळाद्वारे पाणी आल्यास रस्त्यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. मात्र गळती दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाण्याचाही अपव्यय होत आहे. मनपाने गळती दुरुस्त करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणाीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई