शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
4
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
5
बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
6
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
7
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
8
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
9
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
10
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
11
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
12
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
13
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
14
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
15
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
16
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
17
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
18
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
19
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
20
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक

परभणी : नादुरुस्त कालव्यांतूनच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:52 IST

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच लाभ होतो. मात्र मागील काही वर्षांपासून सातत्याने अवर्षण परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडी प्रकल्पातच पुरेसा पाणीसाठा जमा झाला नव्हता. परिणामी परभणीकरांनाही हे पाणी मिळाले नाही. मागील वर्षीचा अपवाद वगळता त्यापूर्वी सुमारे पाच वर्षे या कालव्यातून पाणीच वाहिले नाही. त्यामुळे मुख्य कालव्याबरोबरच शाखा कालवे आणि वितरिकांची दुरवस्था झाली. यावर्षी झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला. त्यामुळे जायकवाडीचे पाणी जिल्ह्याला मिळणार, हे जवळपास निश्चित होते. शेतकरी व राजकीय पक्षांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला रबी हंगामाच्या चार पाणीपाळ्याही मंजूर झाल्या आहेत. पहिली पाणी पाळी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातून वाहणाºया कालव्याची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र दुरुस्तीसाठी मुबलक निधी नसल्याने ही कामे झाली नाहीत. परिणामी तात्पुरती डागडुजी करुनच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्याला रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मुख्य कालव्यांसह उपकालव्यांची योग्य दुरुस्ती झाली असती तर पाण्याची वहन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकºयांना झाला असता. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात या कालव्याचे बांधकाम झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी कालव्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी फरशी फुटली आहे तर काही ठिकाणी पुलांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या कालव्यांचे आयुष्यमान वाढवायचे असेल तर दुरुस्ती, देखभालीसाठीही निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, शासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे.सिंचनातील अडथळेशासकीय यंत्रे वापरणे शक्य४परभणी जिल्ह्यातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या इतर विभागात असलेली यंत्रे, मशिनरी वेळीच उपलब्ध करुन दिली तर योग्य वेळी आणि नियमित कालव्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे. निधी नसला तरी आवश्यक ती शासकीय मशिनरी आणि यंत्रणा वापरली तर दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांत समन्वय वाढवून शासकीय मशिनरीच्या साह्याने दुरुस्ती करुन घेणे आवश्यक आहे.गाळ काढला... भरावही केला...४जायकवाडी कालव्याचे पाणी जास्तीत जास्त शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले. पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांमधील गाळ उपसून घेतला आहे. आवश्यक त्या ठिकाणी भरावही टाकला आहे. पाथरी, मानवत, दैठणा, लोहगाव आणि परभणी या विभागांमध्ये दुरुस्तीची कामे केली आहेत. १७ जेसबी मशीन, दोन टिप्पर, ३ डोजर या मशिनरींच्या साह्याने कामे झाली आहेत. यापुढेही कामे केली जाणार आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली.