शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

परभणी : नादुरुस्त कालव्यांतूनच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:52 IST

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच लाभ होतो. मात्र मागील काही वर्षांपासून सातत्याने अवर्षण परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडी प्रकल्पातच पुरेसा पाणीसाठा जमा झाला नव्हता. परिणामी परभणीकरांनाही हे पाणी मिळाले नाही. मागील वर्षीचा अपवाद वगळता त्यापूर्वी सुमारे पाच वर्षे या कालव्यातून पाणीच वाहिले नाही. त्यामुळे मुख्य कालव्याबरोबरच शाखा कालवे आणि वितरिकांची दुरवस्था झाली. यावर्षी झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला. त्यामुळे जायकवाडीचे पाणी जिल्ह्याला मिळणार, हे जवळपास निश्चित होते. शेतकरी व राजकीय पक्षांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला रबी हंगामाच्या चार पाणीपाळ्याही मंजूर झाल्या आहेत. पहिली पाणी पाळी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातून वाहणाºया कालव्याची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र दुरुस्तीसाठी मुबलक निधी नसल्याने ही कामे झाली नाहीत. परिणामी तात्पुरती डागडुजी करुनच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्याला रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मुख्य कालव्यांसह उपकालव्यांची योग्य दुरुस्ती झाली असती तर पाण्याची वहन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकºयांना झाला असता. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात या कालव्याचे बांधकाम झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी कालव्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी फरशी फुटली आहे तर काही ठिकाणी पुलांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या कालव्यांचे आयुष्यमान वाढवायचे असेल तर दुरुस्ती, देखभालीसाठीही निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, शासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे.सिंचनातील अडथळेशासकीय यंत्रे वापरणे शक्य४परभणी जिल्ह्यातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या इतर विभागात असलेली यंत्रे, मशिनरी वेळीच उपलब्ध करुन दिली तर योग्य वेळी आणि नियमित कालव्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे. निधी नसला तरी आवश्यक ती शासकीय मशिनरी आणि यंत्रणा वापरली तर दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांत समन्वय वाढवून शासकीय मशिनरीच्या साह्याने दुरुस्ती करुन घेणे आवश्यक आहे.गाळ काढला... भरावही केला...४जायकवाडी कालव्याचे पाणी जास्तीत जास्त शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले. पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांमधील गाळ उपसून घेतला आहे. आवश्यक त्या ठिकाणी भरावही टाकला आहे. पाथरी, मानवत, दैठणा, लोहगाव आणि परभणी या विभागांमध्ये दुरुस्तीची कामे केली आहेत. १७ जेसबी मशीन, दोन टिप्पर, ३ डोजर या मशिनरींच्या साह्याने कामे झाली आहेत. यापुढेही कामे केली जाणार आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली.