शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:28 IST

प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़परभणी शहरातील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष इंजिनिरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्टचर, हॉटेल व्यवस्थापन, पॉलिटेक्नीक आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आॅनलाईन प्रवेशाचे केंद्र आहे़ मंगळवारी सकाळी ११ पासून येथील इंटरनेट कनेक्शन बंद पडल्याने यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालकांची एकच तारांबळ उडाली़ दिवसभर या संदर्भात प्रयत्न करूनही नेट सुरू झाले नाही़ त्यामुळे पालक, विद्यार्थी ताटकळत बसले होते़ याबाबत अधिक माहिती घेतली असता, इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा प्रॉब्लेम नांदेडहून असल्याने नेट बंद असल्याचे बीएसएनलएच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे येथील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख प्रा़ उत्कर्ष गडदे यांनी सांगितले़ २६ जून हा प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस आहे़ २५ जून रोजी दिवसभर ही प्रक्रिया ठप्प राहिल्याने शेवटच्या एका दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातून विद्यार्थी शेवटच्या दिवशी आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करणार असल्याने सदरील सर्व्हरवर लोड येऊ शकतो़ परिणामी प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम होवू शकतो, अशी भीती पालकांना वाटू लागली आहे़ त्यामुळे यासाठीच्या कालावधीत वाढ करावी, अशी मागणी पालक- विद्यार्थ्यांमधून होत आहे़गेल्या आठवड्यातही बंद पडली होती प्रक्रिया४व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गोंधळाची प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे़ १८ जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील तीन दिवस सर्व्हर डाऊनमुळे बंद पडली होती़ त्यानंतर २४ जूनपासून नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ त्यामुळे यापूर्वी ज्या विद्यार्थ्याने अर्ज दाखल केले होते, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागत आहे.४पूर्वी अर्ज सादर केलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हित रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुकतांनी दिले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटEducation Sectorशिक्षण क्षेत्र