शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:28 IST

प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़परभणी शहरातील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष इंजिनिरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्टचर, हॉटेल व्यवस्थापन, पॉलिटेक्नीक आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आॅनलाईन प्रवेशाचे केंद्र आहे़ मंगळवारी सकाळी ११ पासून येथील इंटरनेट कनेक्शन बंद पडल्याने यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालकांची एकच तारांबळ उडाली़ दिवसभर या संदर्भात प्रयत्न करूनही नेट सुरू झाले नाही़ त्यामुळे पालक, विद्यार्थी ताटकळत बसले होते़ याबाबत अधिक माहिती घेतली असता, इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा प्रॉब्लेम नांदेडहून असल्याने नेट बंद असल्याचे बीएसएनलएच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे येथील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख प्रा़ उत्कर्ष गडदे यांनी सांगितले़ २६ जून हा प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस आहे़ २५ जून रोजी दिवसभर ही प्रक्रिया ठप्प राहिल्याने शेवटच्या एका दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातून विद्यार्थी शेवटच्या दिवशी आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करणार असल्याने सदरील सर्व्हरवर लोड येऊ शकतो़ परिणामी प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम होवू शकतो, अशी भीती पालकांना वाटू लागली आहे़ त्यामुळे यासाठीच्या कालावधीत वाढ करावी, अशी मागणी पालक- विद्यार्थ्यांमधून होत आहे़गेल्या आठवड्यातही बंद पडली होती प्रक्रिया४व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गोंधळाची प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे़ १८ जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील तीन दिवस सर्व्हर डाऊनमुळे बंद पडली होती़ त्यानंतर २४ जूनपासून नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ त्यामुळे यापूर्वी ज्या विद्यार्थ्याने अर्ज दाखल केले होते, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागत आहे.४पूर्वी अर्ज सादर केलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हित रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुकतांनी दिले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटEducation Sectorशिक्षण क्षेत्र