शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : श्री विसर्जनासाठी जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:22 IST

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत असून, जिल्हाभरात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत़ गणेश विसर्जनाच्या काळात पर्यावरणाचा समतोल रहावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शनिवारीच तयारी केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत असून, जिल्हाभरात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत़ गणेश विसर्जनाच्या काळात पर्यावरणाचा समतोल रहावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शनिवारीच तयारी केली आहे़परभणी शहरात महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात श्री विसर्जनासाठी हौद तयार करण्यात आला असून, गणेश मंडळांनी या ठिकाणीच श्रींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून, शनिवारी ठिक ठिकाणी पथसंचलन करण्यात आले़ १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्हाभरात श्रीगणरायांचे थाटात आगमन झाले़जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना करून दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ या काळात पोलीस प्रशासनाने नियोजन करीत कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राखले.दहा दिवसांच्या या उत्सवाची रविवारी सांगता होत असून, गणरायाला निरोप देताना गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ शनिवारपासूनच श्री विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली आहे़ शनिवारी ठिक ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले़ परभणी शहरामध्ये श्री विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे़ येथील वसमत रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रात विसर्जनासाठी हौद बांधण्यात आला आहे. ५० बाय ५० फुटांचा हा हौद १८ फुट खोल असून, या हौदातच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन महापलिकेने केले आहे़पाणीपुरवठा अभियंता शेख इस्माईल यांनी सांगितले, मागील चार-पाच वर्षांपासून मनपाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे़ जलशुद्धीकरण केंद्र परिसरामध्ये गणेश मंडळांची गर्दी होऊ नये, या दृष्टीने गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी येण्याचा व जाण्याचा स्वतंत्र रस्ता केला आहे़ त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार असून, पोलिसांचा पुरेसा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे़ तेव्हा गणेश भक्तांनी जलशुद्धीकरण केंद्र परिसरातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़गणेश मूर्ती : संकलनाचा उपक्रमश्री गणरायांच्या विसर्जनाच्या दिवशी महापालिकेने शहरातील विविध भागात गणेश मूर्ती संकलनाची सुविधा केली आहे़ नागरिकांनी आपल्या घरातील गणेश मूर्ती प्रभाग समिती अ अंतर्गत जिंतूर रोडवरील गणपती चौक येथे आणून ठेवावेत, तसेच प्रभाग समिती ब अंतर्गत क्रांती चौक, दर्गा रोड परिसरासाठी कृत्रिम रेतन केंद्र या ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे़ प्रभाग समिती क अंतर्गत काळी कमान, देशमुख हॉटेल या ठिकाणी संकलन केले जाणार आहे़ नागरिकांनी मनपाच्या संकलन केंद्रातच गणेश मूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृह नेते भगवान वाघमारे, उपमहापौर माजू लाला, सभापती सुनील देशमुख, आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे़राहटी येथे पोलिसांचा बंदोबस्तवसमत रस्त्यावरील राहटी बंधाºयात यापूर्वी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते़ राहटी बंधाºयात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मागील तीन वर्षांपासून प्रतिबंध करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, विसर्जनासाठी जलशुद्धीकरण केंद्राची जागा निश्चित करण्यात आली आहे़२००० अधिकारी, कर्मचारी नियुक्तीपरभणी- गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला असून, सुमारे २ हजार अधिकारी आणि कर्मचाºयांची बंदोबस्त कामी नियुक्ती केली आहे़ शहरामध्ये ठिक ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावले आहेत़ त्याचप्रमाणे संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्तही लावला आहे़ रविवारी गणरायांना निरोप देण्यासाठी शहराच्या विविध भागातून विसर्जन मिरवणुका काढल्या जातात़ ढोल-ताशांच्या गजरात निघणाºया या मिरवणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरामध्ये बंदोबस्त वाढविला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस