शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

परभणी : भाव घसरल्याने कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:52 IST

गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़अपुरा पाऊस व बोंडअळी यामुळे तालुक्यातील शेतकºयांना कापसाचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही़ कापसाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनपेठ तालुक्यात केवळ ४२८ मिमी पाऊस झाला़ त्यामुळे कापसाची एकाच वेचणीत पºहाटी झाल्याचे चित्र दिसले़ यावर्षी दुष्काळाने संकटांचा डोंगर उभा केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे़ पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती व चारा आणि पाणीटंचाई यामुळे दुष्काळाशी दोन हात करताना बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे़ पावसाने दगा दिल्याने आता अपेक्षा तरी कोणाकडून करायची? या चिंतेत सध्या शेतकरी आहेत. जून, जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या; परंतु, पावसाने दोन महिन्यांचा मोठा खंड दिल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा आली़ आधीच कापसाचे उत्पादन कमी आणि त्यावर मजुरांवर होणारा खर्चही अधिक आहे़ त्यातच गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून, सध्या भाव ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ कापसाच्या भावात होणारी घसरण शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे़ आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे़ कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा असताना भाव मात्र ५ हजार ४०० रुपयांच्या पुढे सरकण्यास तयार नाही़ कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेने अनेक शेतकºयांनी अजूनही आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही़२७ हजार क्विंटल : कापसाची झाली खरेदी४यावर्षी सोनपेठ तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी होते त्या शेतकºयांना कसेबसे कापूस पीक घेतले आहे.४मागील वर्षी सोनपेठ बाजारपेठेत ८१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती; परंतु, यावर्षीच्या दुष्काळाने आतापर्यंत केवळ २७ हजार क्विटंल खरेदी झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून देण्यात आली.७ हजार रुपये क्विंटलचा भाव द्या४ यावर्षी शेतकºयांना दुष्काळामुळे अत्यल्प कापसाचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार पेठेत कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, कापसाचा भाव मात्र दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रती क् िवंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी होत आहे.यावर्षी अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यातच भाव घसरल्याने शेतकºयांना कापूस विक्रीसाठी भाव वधारण्याची वाट पहावी लागत आहे.-केशव भोसले, शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस