शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : भाव घसरल्याने कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:52 IST

गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़अपुरा पाऊस व बोंडअळी यामुळे तालुक्यातील शेतकºयांना कापसाचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही़ कापसाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनपेठ तालुक्यात केवळ ४२८ मिमी पाऊस झाला़ त्यामुळे कापसाची एकाच वेचणीत पºहाटी झाल्याचे चित्र दिसले़ यावर्षी दुष्काळाने संकटांचा डोंगर उभा केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे़ पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती व चारा आणि पाणीटंचाई यामुळे दुष्काळाशी दोन हात करताना बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे़ पावसाने दगा दिल्याने आता अपेक्षा तरी कोणाकडून करायची? या चिंतेत सध्या शेतकरी आहेत. जून, जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या; परंतु, पावसाने दोन महिन्यांचा मोठा खंड दिल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा आली़ आधीच कापसाचे उत्पादन कमी आणि त्यावर मजुरांवर होणारा खर्चही अधिक आहे़ त्यातच गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून, सध्या भाव ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ कापसाच्या भावात होणारी घसरण शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे़ आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे़ कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा असताना भाव मात्र ५ हजार ४०० रुपयांच्या पुढे सरकण्यास तयार नाही़ कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेने अनेक शेतकºयांनी अजूनही आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही़२७ हजार क्विंटल : कापसाची झाली खरेदी४यावर्षी सोनपेठ तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी होते त्या शेतकºयांना कसेबसे कापूस पीक घेतले आहे.४मागील वर्षी सोनपेठ बाजारपेठेत ८१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती; परंतु, यावर्षीच्या दुष्काळाने आतापर्यंत केवळ २७ हजार क्विटंल खरेदी झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून देण्यात आली.७ हजार रुपये क्विंटलचा भाव द्या४ यावर्षी शेतकºयांना दुष्काळामुळे अत्यल्प कापसाचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार पेठेत कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, कापसाचा भाव मात्र दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रती क् िवंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी होत आहे.यावर्षी अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यातच भाव घसरल्याने शेतकºयांना कापूस विक्रीसाठी भाव वधारण्याची वाट पहावी लागत आहे.-केशव भोसले, शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस