शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : भाव घसरल्याने कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:52 IST

गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़अपुरा पाऊस व बोंडअळी यामुळे तालुक्यातील शेतकºयांना कापसाचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही़ कापसाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनपेठ तालुक्यात केवळ ४२८ मिमी पाऊस झाला़ त्यामुळे कापसाची एकाच वेचणीत पºहाटी झाल्याचे चित्र दिसले़ यावर्षी दुष्काळाने संकटांचा डोंगर उभा केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे़ पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती व चारा आणि पाणीटंचाई यामुळे दुष्काळाशी दोन हात करताना बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे़ पावसाने दगा दिल्याने आता अपेक्षा तरी कोणाकडून करायची? या चिंतेत सध्या शेतकरी आहेत. जून, जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या; परंतु, पावसाने दोन महिन्यांचा मोठा खंड दिल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा आली़ आधीच कापसाचे उत्पादन कमी आणि त्यावर मजुरांवर होणारा खर्चही अधिक आहे़ त्यातच गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून, सध्या भाव ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ कापसाच्या भावात होणारी घसरण शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे़ आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे़ कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा असताना भाव मात्र ५ हजार ४०० रुपयांच्या पुढे सरकण्यास तयार नाही़ कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेने अनेक शेतकºयांनी अजूनही आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही़२७ हजार क्विंटल : कापसाची झाली खरेदी४यावर्षी सोनपेठ तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी होते त्या शेतकºयांना कसेबसे कापूस पीक घेतले आहे.४मागील वर्षी सोनपेठ बाजारपेठेत ८१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती; परंतु, यावर्षीच्या दुष्काळाने आतापर्यंत केवळ २७ हजार क्विटंल खरेदी झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून देण्यात आली.७ हजार रुपये क्विंटलचा भाव द्या४ यावर्षी शेतकºयांना दुष्काळामुळे अत्यल्प कापसाचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार पेठेत कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, कापसाचा भाव मात्र दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रती क् िवंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी होत आहे.यावर्षी अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यातच भाव घसरल्याने शेतकºयांना कापूस विक्रीसाठी भाव वधारण्याची वाट पहावी लागत आहे.-केशव भोसले, शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस