शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : उष्माघाताने चौघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 18:41 IST

दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़दरवर्षी उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्याचे तापमान ४४ अंशापर्यंत पोहोचते़ मागील काही वर्षांचा अनुभव पाहता एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकतो़ यावर्षी दीड महिन्यापासून पारा वाढलेला असून, आजपर्यंत तो कमी झाला नाही़ त्यामुळे नागरिकांना हे ऊन असह्य करणारे ठरत आहे़ मागील चार दिवसांमध्ये चौघांचा बळी गेला आहे़ १० मे रोजी सेलू तालुक्यातील खेर्डा बु़ येथील संभाजी सोनवणे या ६५ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला़ जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली़ त्यानंतर ११ मे रोजी डिघोळ येथील ५० वर्षीय सोजरबाई हजारे, १२ मे रोजी सोनपेठ येथील ऐश्वरी धनंजय डहाळे या ६ महिन्यांच्या बालिकेचा आणि १३ मे रोजी बामणी येथील सुदाम नेमाडे या ५२ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. या चारही दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यात ४४ अंश एवढे तापमान होते़ चार दिवसांत चौघांचा उष्णतेमुळे बळी गेल्याने उन्हाची तीव्रता लक्षात येते़ मागील महिनाभरापासून जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ सकाळी १० वाजेपासून तापणाऱ्या ऊन्हाची सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीव्रता कायम राहत आहे़ त्यामुळे दिवसभर रस्ते सुनसान पडत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमानDeathमृत्यू