शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

परभणी : उष्माघाताने चौघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 18:41 IST

दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़दरवर्षी उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्याचे तापमान ४४ अंशापर्यंत पोहोचते़ मागील काही वर्षांचा अनुभव पाहता एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकतो़ यावर्षी दीड महिन्यापासून पारा वाढलेला असून, आजपर्यंत तो कमी झाला नाही़ त्यामुळे नागरिकांना हे ऊन असह्य करणारे ठरत आहे़ मागील चार दिवसांमध्ये चौघांचा बळी गेला आहे़ १० मे रोजी सेलू तालुक्यातील खेर्डा बु़ येथील संभाजी सोनवणे या ६५ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला़ जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली़ त्यानंतर ११ मे रोजी डिघोळ येथील ५० वर्षीय सोजरबाई हजारे, १२ मे रोजी सोनपेठ येथील ऐश्वरी धनंजय डहाळे या ६ महिन्यांच्या बालिकेचा आणि १३ मे रोजी बामणी येथील सुदाम नेमाडे या ५२ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. या चारही दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यात ४४ अंश एवढे तापमान होते़ चार दिवसांत चौघांचा उष्णतेमुळे बळी गेल्याने उन्हाची तीव्रता लक्षात येते़ मागील महिनाभरापासून जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ सकाळी १० वाजेपासून तापणाऱ्या ऊन्हाची सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीव्रता कायम राहत आहे़ त्यामुळे दिवसभर रस्ते सुनसान पडत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमानDeathमृत्यू