शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

परभणी: २० हजार मजुरांवर बेरोजगारीची कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:59 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील मजुरांवर झाला आहे. सुमारे २० हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील मजुरांवर झाला आहे. सुमारे २० हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.‘मागेल त्याला काम’ देण्याच्या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतामध्ये कामे शिल्लक नाहीत. परिणामी मजुरांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहे. आॅक्टोबर महिन्यापासून मजूर मंडळी कामाच्या शोधात असताना दुसरीकडे रोजगार हमी योजनेची कामेही सुरु होत नसल्याने मजुरांची उपासमार होत होती. जानेवारी महिन्यापासून रोहयोच्या कामांची संख्या वाढली. त्यामुळे मजुरांना स्थानिक पातळीवर काम उपलब्ध होऊ लागले. दुष्काळी परिस्थितीत रोहयोचे हक्काचे काम मिळत असल्याने मजुरांची आर्थिक समस्या काहीशी दूर झाली होती. मात्र ही परिस्थिती जास्त काळ टिकली नाही. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर नवीन कामांना मंजुरी देण्यास बंधने निर्माण झाली. परिणामी मागील १५ दिवसांपासून एकही नवीन काम सुरु झाले नाही.रोहयोच्या कामांच्या स्थितीचा आढावा घेतला असता २२ हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची ११७१ कामे सुरु होती. या कामांवर ४१ हजार १९५ मजुरांना काम मिळाले. ही कामे साधारणत: १५ दिवसांपर्यंत सुरु राहिली. त्यानंतर मात्र आचारसंहितेमुळे एकाही कामाला मंजुरी मिळाली नाही. जुनीच कामे सध्या सुरु आहेत. २१ ते २७ मार्च या आठवड्यात जिल्ह्यामध्ये ५०१ कामे सुरु होती. या कामांवर १९ हजार ९४५ मजुरांना काम मिळाले. फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सुरु असलेल्या कामांमधून ६७० कामांची घट झाल्याने मजुरांची उपस्थितीही कमी झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांच्या काळात एकाही नवीन कामाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सुमारे २२ हजार २ मजुरांना आचारसंहितेचा फटका सहन करावा लागत आहे. आता नवीन कामे सुरु होण्यासाठी किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असून आचारसंहिता संपल्यानंतरच नवीन कामे सुरु होण्याची शक्यता आहे.दुष्काळी परिस्थितीत हाताला काम मिळत नसल्याने आधीच मजूर मंडळी अडचणीत असताना त्यात आचारसंहितेची भर पडल्याने जिल्ह्यातील मजुरांच्या समस्या वाढल्या आहेत.घरकुले, सिंचन विहिरींची कामे४रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आचारसंहितेपूर्वी ज्या कामांना मंजुरी दिली होती. ती सध्या सुरु आहेत. रोहयो विभागाकडून पंचायत समितीमार्फत सिंचन विहिरी, विहिरींचे पूनर्भरण, घरकुल योजनेंतर्गत घरकुल बांधकाम, रोपवाटिका आणि तुती लागवड ही कामे सध्या केली जात आहेत. यातील बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४०५ कामे सुरु असून त्यावर १६ हजार ४१७ मजूर काम करीत आहेत. तर शासकीय यंत्रणेअंतर्गत ९६ कामे सुरु असून त्यावर ३ हजार ५२८ मजुरांना कामे मिळाली आहेत.पालम तालुक्यात रोहयोला फाटा४जिल्ह्यात रोहयोची ५०१ कामे सुरु असली तरी पालम तालुक्यात मात्र एकही काम सुरु नसल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. तर परभणी तालुक्यामध्ये केवळ ५ कामे सुरु असून या कामांवर २७० मजूर कामे करीत आहेत. मानवत तालुक्यात ४४ कामांवर ३ हजार १८० मजूर, जिंतूर तालुक्यात ५२ कामांवर १८३ मजूर, पाथरी तालुक्यात ४० कामांवर २ हजार ७६० मजूर, पूर्णा तालुक्यात ११० कामांवर ६ हजार १९०, सेलू तालुक्यात १६६ कामांवर ४ हजार ८१२ आणि गंगाखेड तालुक्यात ८४ कामे सुरु असून या कामांवर १ हजार ६२६ मजुरांना काम मिळाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा