शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

परभणी आगारातील प्रकार;ड्युटी न मिळाल्यास टाकली जातेय रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:39 IST

बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.परभणी आगारामधून दररोज सकाळी वाहक आणि चालकांना बसगाड्यांचे नियोजन करुन ड्युटी दिली जाते. त्यामुळे येथील आगारात सकाळी वाहक-चालक उपस्थित राहतात; परंतु, अनेकांना ही ड्युटी मिळत नाही.परभणी आगारामध्ये बसगाड्यांची संख्या कमी असल्याने सर्व मार्गावर बसफेºया चालविल्या जात नाहीत. परिणामी दररोज तीन ते चार चालक-वाहकांना ड्युटीच मिळत नाही. हे वाहक-चालक नियमानुसार सेवेसाठी हजर झाल्याने त्यांची त्या दिवसाची सेवा ग्राह्य धरणे अपेक्षित आहे; परंतु, या चालक-वाहकांकडून रजा घेतली जाते. त्यावर ‘कामगिरी नाही’, असा उल्लेखही केला जातो. वाहक आणि चालकांना ड्युटी देण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळाची आहे. महामंडळ चालक-वाहकांना काम उपलब्ध करुन देत नसेल तर त्यांच्याकडून रजा घेणे नियमबाह्य आहे. यात चालक आणि वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एस.टी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन वाहक-चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात प्रभारी आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार फोन केले; परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने आगाराची बाजू समजू शकली नाही.खराब रस्त्यांचाही कर्मचाºयांना फटकापरभणी आगारामध्ये एकूण ३१० चालक, वाहक आहेत. तसेच ६५ बसगाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी १० बसगाड्या नादुरुस्त असतात. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ५५ बसगाड्यांचाच वापर होत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावरील बससेवा ठप्प आहे. परिणामी सर्व वाहक-चालकांना दररोज ड्युटी मिळत नाही आणि सेवेवर हजर झाले असतानाही महामंडळाच्या नियोजनाअभावी वाहक, चालकांची रजा घेतली जात आहे.अतिरिक्त कामाचा मोबदला मिळेनावाहक आणि चालकांना नियमानुसार २०० कि.मी. अंतरापर्यंची ड्युटी देऊन ८ तासांची सेवा त्यांच्याकडून करुन घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात काही वाहक, चालकांना ३०० कि.मी.ची ड्युटी देऊन १२ तासांपर्यंतची सेवा करुन घेतली जात आहे. अतिरिक्त ४ तासांच्या सेवेचा मोबदलाही मिळत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केल्या.असा प्रकार होत नाहीग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने बससेवा पोहचविण्यासाठी वेळ लागत आहे. काही वाहक-चालक ठराविक रुटसाठीच आग्रह धरतात; परंतु, वाहक आणि चालकांना ड्युटी भेटत नाही, असा प्रकार होत नाही. एखाद्या वाहक-चालकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल.-जालिंदर सिरसाट, विभागीय नियंत्रक

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळ