शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी आगारातील प्रकार;ड्युटी न मिळाल्यास टाकली जातेय रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:39 IST

बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.परभणी आगारामधून दररोज सकाळी वाहक आणि चालकांना बसगाड्यांचे नियोजन करुन ड्युटी दिली जाते. त्यामुळे येथील आगारात सकाळी वाहक-चालक उपस्थित राहतात; परंतु, अनेकांना ही ड्युटी मिळत नाही.परभणी आगारामध्ये बसगाड्यांची संख्या कमी असल्याने सर्व मार्गावर बसफेºया चालविल्या जात नाहीत. परिणामी दररोज तीन ते चार चालक-वाहकांना ड्युटीच मिळत नाही. हे वाहक-चालक नियमानुसार सेवेसाठी हजर झाल्याने त्यांची त्या दिवसाची सेवा ग्राह्य धरणे अपेक्षित आहे; परंतु, या चालक-वाहकांकडून रजा घेतली जाते. त्यावर ‘कामगिरी नाही’, असा उल्लेखही केला जातो. वाहक आणि चालकांना ड्युटी देण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळाची आहे. महामंडळ चालक-वाहकांना काम उपलब्ध करुन देत नसेल तर त्यांच्याकडून रजा घेणे नियमबाह्य आहे. यात चालक आणि वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एस.टी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन वाहक-चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात प्रभारी आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार फोन केले; परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने आगाराची बाजू समजू शकली नाही.खराब रस्त्यांचाही कर्मचाºयांना फटकापरभणी आगारामध्ये एकूण ३१० चालक, वाहक आहेत. तसेच ६५ बसगाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी १० बसगाड्या नादुरुस्त असतात. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ५५ बसगाड्यांचाच वापर होत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावरील बससेवा ठप्प आहे. परिणामी सर्व वाहक-चालकांना दररोज ड्युटी मिळत नाही आणि सेवेवर हजर झाले असतानाही महामंडळाच्या नियोजनाअभावी वाहक, चालकांची रजा घेतली जात आहे.अतिरिक्त कामाचा मोबदला मिळेनावाहक आणि चालकांना नियमानुसार २०० कि.मी. अंतरापर्यंची ड्युटी देऊन ८ तासांची सेवा त्यांच्याकडून करुन घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात काही वाहक, चालकांना ३०० कि.मी.ची ड्युटी देऊन १२ तासांपर्यंतची सेवा करुन घेतली जात आहे. अतिरिक्त ४ तासांच्या सेवेचा मोबदलाही मिळत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केल्या.असा प्रकार होत नाहीग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने बससेवा पोहचविण्यासाठी वेळ लागत आहे. काही वाहक-चालक ठराविक रुटसाठीच आग्रह धरतात; परंतु, वाहक आणि चालकांना ड्युटी भेटत नाही, असा प्रकार होत नाही. एखाद्या वाहक-चालकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल.-जालिंदर सिरसाट, विभागीय नियंत्रक

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळ