शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परभणी : दोन हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:56 IST

२०१७-१८ या आर्थिक वर्षात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केलेल्या मात्र त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात न आलेल्या जिल्ह्यातील हरभरा व तूर उत्पादक ७ हजार शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती़ त्यानुसार ४ हजार ८५१ शेतकºयांना आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे़ बँक खाते आधारशी जुळत नसल्याने २ हजार १४९ शेतकºयांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७-१८ या आर्थिक वर्षात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केलेल्या मात्र त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात न आलेल्या जिल्ह्यातील हरभरा व तूर उत्पादक ७ हजार शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती़ त्यानुसार ४ हजार ८५१ शेतकºयांना आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे़ बँक खाते आधारशी जुळत नसल्याने २ हजार १४९ शेतकºयांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे़जिल्ह्यात खरीप हंगाम २०१७ मध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले़ तसेच रबी हंगामात शेतकºयांनी पारंपारिक ज्वारी पिकाला फाटा देत हरभºयाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले़ त्यातून शेतकºयांना उत्पन्नही चांगले मिळाले़ मात्र शेतकºयांचा शेतमाल बाजारपेठेत विक्रीस आणल्यानंतर व्यापाºयांनी कवडीमोल दराने शेतमालाची खरेदी सुरू केली़ त्यामुळे उत्पादन होवूनही शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली़ तेव्हा राज्य शासनाने जिल्ह्यातील आठ ठिकाणी हंगाम २०१७-१८ साठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले़ १७ हजार ५७० शेतकºयांनी आपली तूर विक्री करण्यासाठी नोंदणी केली़ मात्र पुरेशा प्रमाणात जिल्हा मार्केटींक अधिकारी कार्यालयास गोदाम उपलब्ध झाली नाहीत़ त्यामुळे तूर खरेदी करण्याची गती धिमी राहिली़ परिणामी राज्य शासनाने १५ मे २०१८ पर्यंत दिलेल्या मुदतवाढीत केवळ ४ हजार ६९८ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली़ तर तीच परिस्थिती हरभरा खरेदी करतानाही उद्भवली़ त्यामुळे ज्या शेतकºयांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे आपला शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे़ परंतु, तांत्रिक अडचणीमुळे हमीभाव खरेदी केंद्राकडून शेतकºयांचा शेतमाल खरेदी करण्यात आला नाही़ अशा शेतकºयांना प्रती हेक्टर १० हजार रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडून देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते़ त्यानुसार जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील ७ हजार तूर व हरभरा उत्पादकांची यादी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली होती़ या यादीनुसार ६ नोव्हेंबरपासून आतापर्यंत हजार ४ हजार ८५१ शेतकºयांना राज्य शासनाने त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली आहे़विशेष म्हणजे उर्वरित २ हजार १४९ शेतकºयांचे बँक खाते व आधार कार्ड यांचा ताळमेळ बसत नसल्याने या शेतकºयांच्या याद्या पुन्हा दुरुस्त करून पाठवाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत़ त्यामुळे या शेतकºयांना सध्या तरी राज्य शासनाच्या या अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे़अनुदान देण्यासही वर्षभराचा कालावधीगतवर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले़ या संधीचा फायदा घेत व्यापाºयांनी शेतकºयांचा शेतमाल कवडीमोल दराने खरेदी करण्यास सुरुवात केली़ हरभरा पिकाच्या बाबतीतही गतवर्षी रबी हंगामात १५० टक्के हरभºयाची पेरणी झाली़ त्यामुळे उत्पादनही भरघोस झाले़ मात्र याचा फायदा व्यापाºयांनी उठवित कवडीमाल दराने मालाची खरेदी केली़ त्यामुळे शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर आपला माल विक्रीसाठी शेतकºयांनी नोंदणी केली़ परंतु, त्यातील जवळपास १७ हजार शेतकºयांचा शेतमाल हमीभाव खरेदी केंद्राकडून खरेदी करण्यात आला नाही़ त्यामुळे या शेतकºयांना अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले़ परंतु, हे अनुदान देतानही राज्य शासनाने जवळपास एक वर्षाचा कालावधी लावला़ त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे़जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील ७ हजार शेतकºयांची यादी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली होती़ त्यातील जवळपास ५ हजार शेतकºयांच्या नावे अनुदानाची रक्कम जमा झाली आहे़ बँक खाते आधार क्रमांकाशी जुळत नसल्याने २ हजार १४९ शेतकºयांच्या याद्या दुरुस्त करून पाठविण्याचे काम सुरू आहे़ या शेतकºयांनाही लवकरच अनुदान मिळेल़-कापुरे, जिल्हा मार्केटींग अधिकारी, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार