शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

परभणी : गोदावरीवर ३४ कोटी खर्चून होणार दोन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:40 IST

जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या पुलांच्या मागणीचा प्रश्न निकाली निघणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरीनदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या पुलांच्या मागणीचा प्रश्न निकाली निघणार आहे़परभणी ते पालम या ताडकळसकमार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या गावाजवळ गोदावरीनदीवर कमी उंचीचा पूल अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे़ गोदावरी नदीला पूर आल्यानंतर हा रस्ता अनेक वेळा बंद झालेला आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत होती़ शिवाय हा जुना पूल असल्याने येथे नव्याने पूल उभारण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती़ याशिवाय पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयाची पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे़ त्यामुळे या बंधाºयात अधिक पाणीसाठा झाल्यास जुना पुल पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता होती़ त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर चर्चाही झाली; परंतु, पुलाची उंची वाढविण्याऐवजी थेट नव्यानेच पूल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला़ त्यानुसार आता या पुलाच्या २० मीटर बाजुला नव्याने पूल उभारण्यात येणार आहे़ जुन्या पुलापेक्षा साडेचार मीटर अधिक उंचीचा हा पूल राहणार आहे़ यासाठी १९ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ हा निधीही राज्यस्तरावर उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत़ १० डिसेंबरपर्यंत या कामासाठी इच्छुक कंत्राटदारांना निविदा सादर करता येणार आहेत़त्यानंतर निविदा मंजुरी व प्रत्यक्ष कामाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे़साधारणत: जानेवारी अखेरपर्यंत ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल़ त्यानंतर कंत्राटदार निश्चित होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे़वझूरजवळील पुलामुळे लातूरचे अंतर घटणारपूर्णा तालुक्यातील पिंगळी-ताडलिमला-वझूर-रावराजूर-मरडसगाव या राज्य महामार्ग ३५ क्रमांकावर वझूर गावाजवळील गोदावरी नदीवर पूल उभारण्यात येणार आहे़ या पुलाच्या कामाचे भूमीपूजन २४ जून रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते़ आता या रस्ता कामासाठी १५ कोटी ९ लाख ५२ हजार २८१ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ त्यामुळे या कामाच्याही निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ नोव्हेंबर रोजी काढल्या आहेत़ त्यानुसार इच्छुक कंत्राटदारांना १५ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत़ त्यानंतर २१ डिसेंबर रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत़ याच दिवशी या कामाचा कंत्राटदार निश्चित होणार आहे़ त्यामुळे या प्रलंबित बहुप्रतीक्षित रस्त्यावरील पुलाचा प्रश्नही मार्गी लागला आहे़ या रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल झाल्यास नांदेड-हिंगोली-नागपूरहून येणाºया वाहनांना त्रिधारा पाटी-पिंगळी-लिमला-वझूरमार्गे लातूरला जाता येणार आहे़ यामुळे जवळपास ५० ते ६० किमी लातूरचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार या पुलाचा ८ ते ९ तालुक्यांना लाभ होणार आहे़ तसेच या भागात दळणवळणाची साधनेही वाढणार आहेत़पुलांची वेगाने कामे होण्याची गरज४जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील दोन्ही मोठ्या पुलांच्या कामासाठी जवळपास ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे़ या कामाच्या निविदाही निघाल्या आहेत़ त्यामुळे प्रत्यक्ष कामाला निविदा प्रक्रियेनंतर तातडीने सुरुवात होणे आवश्यक आहे़४एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे़ त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते़ त्यामुळे तत्पूर्वीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे़ यासाठी प्रशासकीय पातळीवरून सूत्रे हलणे गरजेचे आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीgodavariगोदावरी