शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

परभणी : विज्ञान दिनानिमित्त स्मशानभूमीत काढली सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:17 IST

स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.स्मशानभूमी म्हटलं की अंगावर काटा येतो. या ठिकाणी भुतांचा वावर असतो, अमावस्येला ही भूते बाहेर येतात, असे अनेक गैरसमज आहेत. विज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागात या समजुती अजूनही रुढ आहेत. विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या विषयी जनजागृती व्हावी, ते विज्ञाननिष्ठ व्हावेत व भूत आणि भुतांबद्दलचा गैरसमज दूर व्हावा, या उद्देशाने टाकळी कुंभकर्ण येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विज्ञान शिक्षक प्रकाश पंडित यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्मशानभूमीत सहल नेण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच झरी येथील स्व.इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम स्मशानभूमीत विद्यार्थ्यांना नेण्यात आले. या ठिकाणी चार ते पाच तास विद्यार्थी थांबले. घरुन तळून आणलेले भजे व इतर जेवण याच ठिकाणी त्यांनी केले.विशेष म्हणजे, या स्मशानभूमीतील मसनजोगी पवार यांच्याशीही विद्यार्थ्यांनी संवाद साधला. पवार हे याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे सहा वर्षांचा त्यांचा नातूही स्मशानभूमीतच राहतो. यावेळी विद्यार्थ्यांनी भुतांबद्दल असलेल्या गैरसमजाविषयी त्यांना विचारणा केली. स्मशानभूमीत तेलकट खाल्ल्याने भुते बाहेर येतात का? असाही प्रश्न या विद्यार्थ्यांनी केला. या सर्व गैरसमजुतीचे पवार आणि विज्ञान शिक्षक प्रकाश पंडित यांनी निराकरण केले.४या शैक्षणिक सहलीविषयी माहिती देताना प्रकाश पंडित म्हणाले, शाळेमध्ये नित्यनेमाने विज्ञान उपक्रम राबविले जातात, फेब्रुवारी महिन्यात २८ तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्मशानभूमीत सहल नेण्याचा निर्णय घेतला. कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी झरी येथील स्मशानभूमीचे अतिशय रेखीवपणे सुशोभिकरण केले आहे. वेगवेगळी फुलांची झाडे, आकर्षक बांधकाम, आसन व्यवस्था, रंगरंगोटी, सुविचारांने ही स्मशानभूमी सजविली आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत विद्यार्थ्यांची सहल घडविली, असे पंडित यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीscienceविज्ञान