शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

परभणी : दुहेरीकरणानंतरही प्रवाशांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:40 IST

मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.रेल्वे मार्गावरुन जास्तीत जास्त गाड्या धावाव्यात, कमी वेळेत अंतर पार करता यावे आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, या हेतुने रेल्वे विभागाने मुदखेड ते मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मुदखेड ते परभणी दुहेरीमार्ग पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्या विना अडथळा धावतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. जलद गाड्यांच्या प्रवासात काही थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असली तरी सवारी गाड्यांचा प्रश्न मात्र कायम आहे. रेल्वे गाड्यांच्या लूज टाईमचे नियोजन होत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.निजामाबाद - पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी नांदेड येथून रेल्वे वेळापत्रकान्वये ४ वाजता निघून परभणी येथे ६.२० वाजता पोहचणे अपेक्षित आहे. मात्र या रेल्वेगाडीला मोठ्या प्रमाणात लूज टाईम दिला आहे. नांदेड येथून निघाल्यानंतर पूर्णा स्थानकावर साधारणत: अर्धा तास आणि त्यानंतर मिरखेल स्थानकावर एक तास ही रेल्वेगाडी कारण नसतानाही थांबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नांदेडहून ४.४५ वाजता निघालेली नंदीग्राम एक्सप्रेस आणि ५.३० वाजता निघणारी पनवेल एक्सप्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या पुढे सोडून त्यानंतर पंढरपूर पॅसेंजर रेल्वे परभणीकडे मार्गस्थ केली जात आहे. परिणामी, परभणीत ६.२० वाजता पोहोचणे अपेक्षित असणारी ही रेल्वेगाडी तब्बल १ तास उशिराने ७.२० पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे दुहेरीकरण होऊनही प्रवाशांचा त्रास कायम असून रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकाचे नियोजन करुन पॅसेंजर आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या वेळेत धावतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडीpassengerप्रवासी