शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

परभणी : दुहेरीकरणानंतरही प्रवाशांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:40 IST

मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.रेल्वे मार्गावरुन जास्तीत जास्त गाड्या धावाव्यात, कमी वेळेत अंतर पार करता यावे आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, या हेतुने रेल्वे विभागाने मुदखेड ते मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मुदखेड ते परभणी दुहेरीमार्ग पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्या विना अडथळा धावतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. जलद गाड्यांच्या प्रवासात काही थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असली तरी सवारी गाड्यांचा प्रश्न मात्र कायम आहे. रेल्वे गाड्यांच्या लूज टाईमचे नियोजन होत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.निजामाबाद - पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी नांदेड येथून रेल्वे वेळापत्रकान्वये ४ वाजता निघून परभणी येथे ६.२० वाजता पोहचणे अपेक्षित आहे. मात्र या रेल्वेगाडीला मोठ्या प्रमाणात लूज टाईम दिला आहे. नांदेड येथून निघाल्यानंतर पूर्णा स्थानकावर साधारणत: अर्धा तास आणि त्यानंतर मिरखेल स्थानकावर एक तास ही रेल्वेगाडी कारण नसतानाही थांबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नांदेडहून ४.४५ वाजता निघालेली नंदीग्राम एक्सप्रेस आणि ५.३० वाजता निघणारी पनवेल एक्सप्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या पुढे सोडून त्यानंतर पंढरपूर पॅसेंजर रेल्वे परभणीकडे मार्गस्थ केली जात आहे. परिणामी, परभणीत ६.२० वाजता पोहोचणे अपेक्षित असणारी ही रेल्वेगाडी तब्बल १ तास उशिराने ७.२० पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे दुहेरीकरण होऊनही प्रवाशांचा त्रास कायम असून रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकाचे नियोजन करुन पॅसेंजर आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या वेळेत धावतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडीpassengerप्रवासी