शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

परभणी: बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:36 IST

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. या सातही आगाराला जोडणारा दुवा म्हणजे परभणी येथील आगार आहे. परभणी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या आगारातून जिल्ह्यातील ९ तालुक्यांसह हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारात थेट बससेवा असणे आवश्यक आहे; परंतु, एकीकडे १३ कोटी रुपये खर्च करुन बसपोर्टच्या कामाचे भूमिपूजन झाले असताना दुसरीकडे याच आगारातील प्रवाशांना बसच उपलब्ध नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे गुरुवारी व शुक्रवारी दिसून आले. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसला होणारी गर्दी लक्षात घेता परभणी बसस्थानक आगार प्रशासनाने प्रवाशांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते; परंतु, तसे होताना दिसून आले नाही.परभणी आगारामध्ये ६८ बसेस आहेत. यातील १५ बसेस दररोज दुरुस्तीसाठी आगारात उभ्या असतात. त्यामुळे उर्वरित ५३ बसच्या माध्यमातून आगारातून ६४ फेºया मारल्या जातात. त्यामुळे अनेक तालुक्यांसह ग्रामीण भागात बस पोहचविण्यासाठी विलंब होत आहे. त्याच बरोबर गाडी नादुरुस्त झाल्यास अनेक बसफेºया रद्द झाल्याचेही प्रकार समोर आले आहे. ज्या बसेस रस्त्यावरुन धावत आहेत. त्याही खिळखिळ्या झालेल्या आहेत. या बसमधूनच प्रवाशांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. नव्या बसची परभणी आगाराने मागणी करुनही बस मिळत नसल्याने आहे, त्याच बसेसवर भागवावे लागत आहे. यामुळे भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभागीय नियंत्रक कार्यालयाने याकडे लक्ष देऊन परभणी आगाराला नवीन बस उपलब्ध करुन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.ग्रामीण भागात: भंगार बसच्या फेºया४परभणी आगारातून तालुक्यातील उमरी, लोहरा, भोसा, कुंभारी बाजार, साडेगाव, मांडाखळी, पेडगाव, स.पिंपळगाव, रामपुरी यासह अनेक गावांमध्ये बसफेºया सुरु आहेत. यातून आगाराला मोठे उत्पन्नही मिळते; परंतु, मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागात जाणाºया बसेस या पूर्णत: खिळखिळ्या झाल्या आहेत.४ काही बसेसच्या तर खिडक्या, तावदाने, आसन व्यवस्था मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच बरोबर प्रचंड धुळीच्या वातावरणात प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे मात्र आगार प्रशासन, ना विभागीय नियंत्रकांचे लक्ष आहे. परिणामी नाईलाजास्तव ग्रामीण भागातील प्रवाशांना बसने प्रवास करणे भाग पडत आहे.४परभणी आगारातून धावणाºया बसेसमधून मोठ्या प्रमाणातून धूर बाहेर पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी प्रवाशांसह नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. भंगार बसेस बंद करुन नवीन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी