शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परभणी: बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:36 IST

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. या सातही आगाराला जोडणारा दुवा म्हणजे परभणी येथील आगार आहे. परभणी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या आगारातून जिल्ह्यातील ९ तालुक्यांसह हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारात थेट बससेवा असणे आवश्यक आहे; परंतु, एकीकडे १३ कोटी रुपये खर्च करुन बसपोर्टच्या कामाचे भूमिपूजन झाले असताना दुसरीकडे याच आगारातील प्रवाशांना बसच उपलब्ध नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे गुरुवारी व शुक्रवारी दिसून आले. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसला होणारी गर्दी लक्षात घेता परभणी बसस्थानक आगार प्रशासनाने प्रवाशांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते; परंतु, तसे होताना दिसून आले नाही.परभणी आगारामध्ये ६८ बसेस आहेत. यातील १५ बसेस दररोज दुरुस्तीसाठी आगारात उभ्या असतात. त्यामुळे उर्वरित ५३ बसच्या माध्यमातून आगारातून ६४ फेºया मारल्या जातात. त्यामुळे अनेक तालुक्यांसह ग्रामीण भागात बस पोहचविण्यासाठी विलंब होत आहे. त्याच बरोबर गाडी नादुरुस्त झाल्यास अनेक बसफेºया रद्द झाल्याचेही प्रकार समोर आले आहे. ज्या बसेस रस्त्यावरुन धावत आहेत. त्याही खिळखिळ्या झालेल्या आहेत. या बसमधूनच प्रवाशांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. नव्या बसची परभणी आगाराने मागणी करुनही बस मिळत नसल्याने आहे, त्याच बसेसवर भागवावे लागत आहे. यामुळे भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभागीय नियंत्रक कार्यालयाने याकडे लक्ष देऊन परभणी आगाराला नवीन बस उपलब्ध करुन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.ग्रामीण भागात: भंगार बसच्या फेºया४परभणी आगारातून तालुक्यातील उमरी, लोहरा, भोसा, कुंभारी बाजार, साडेगाव, मांडाखळी, पेडगाव, स.पिंपळगाव, रामपुरी यासह अनेक गावांमध्ये बसफेºया सुरु आहेत. यातून आगाराला मोठे उत्पन्नही मिळते; परंतु, मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागात जाणाºया बसेस या पूर्णत: खिळखिळ्या झाल्या आहेत.४ काही बसेसच्या तर खिडक्या, तावदाने, आसन व्यवस्था मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच बरोबर प्रचंड धुळीच्या वातावरणात प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे मात्र आगार प्रशासन, ना विभागीय नियंत्रकांचे लक्ष आहे. परिणामी नाईलाजास्तव ग्रामीण भागातील प्रवाशांना बसने प्रवास करणे भाग पडत आहे.४परभणी आगारातून धावणाºया बसेसमधून मोठ्या प्रमाणातून धूर बाहेर पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी प्रवाशांसह नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. भंगार बसेस बंद करुन नवीन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी