शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

परभणी : दीड हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क येलदरी ( परभणी  ): येथील येलदरी धरणात मागील चार ते पाच वर्षापासून अत्यल्प पाणीसाठा राहत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी ): येथील येलदरी धरणात मागील चार ते पाच वर्षापासून अत्यल्प पाणीसाठा राहत असल्याने धरणातील मत्य्सय व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे दीड हजाराहून अधिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.येलदरी धरणात मागील ५० वर्षापासून मत्स्य व्यवसाय केला जातो. या व्यवसायापासून जवळपास दीड हजाराहून अधिक कुटुंंबातील नागरिकांची उपजिविका अवलंबून आहे. काही वर्षापासून येलदरी धरणातील गोड्या पाण्यातील माशाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. मागील तीन वर्षापासून पहिल्यांदाच गोड्या पाण्यातील प्रॉन्स विकसित केला आहे.येलदरी येथील गोड्या पाण्यात झिंगा मिळू लागल्याने या जलाशयाची वेगळी ओळख गोड्या पाण्यातील माशांबरोबरच गोड्या पाण्यातील झिंग्यामुळे सर्वत्र झाली. मात्र मागील चार वर्षापासून या धरणावर निसर्गाची अवकृपा झाल्याने पाणीसाठी अधिक प्रमाणात होत नाही. त्यामुळे मस्त्य व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. त्यामुळे येथील मत्स्य व्यावसायिकांच्या आर्थिक तोट्यात मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे. येलदरी धरणातील कमी होणाऱ्या पाण्यामुळे या व्यवसायात असलेल्या दीड हजार कुटुंबियांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. पाण्याअभावी मत्स्य व्यवसाय थंडावला असल्याने बाजारपेठेत देखील शुकशुकाट दिसून येत आहे. विशेष म्हणजे येलदरी येथील मत्स्य व्यवसायामुळे या भागातील मच्छीमारी करणाºया ग्रामस्थांचे जीवनमान सुधारले होते. मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यावर्षी संपूर्ण पावसाळा संपला तरी देखील धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.धरणात नव्याने मत्स्य बीज सोडण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्याने माशांची निर्मिती होत नाही. परिणामी या व्यवसायावर अवलंबून असलेला कामगार चांगलाच अडचणीत आला आहे. येणाºया काळात चांगला पाऊस न पडल्यास येलदरी धरणावर पोट भरणाºया हजारो मच्छीमार व त्यांच्या कुटुंबियांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते.मागील चार ते पाच वर्षापासून या भागात अवर्षण सदृष्य परिस्थिती निर्माण होत असून शासनाने नदीजोड प्रकल्पाच्या योजनेत येलदरी धरणाचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यवसायिकांमध्ये व्यक्त होत आहे.शासनाकडून: मदतीची आवश्यकता४केवळ मत्स्यव्यवसायावर उपजिविका असलेल्यांची आता उपासमार होऊ लागली आहे. धरणामध्ये पाणी नसल्याने विक्रीसाठी मासे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.४केंद्र शासनाने ज्या प्रमाणे भूजलाशयीन, सागरी व निखारे पाणी क्षेत्रातील मत्सोत्पादन वाढीस लागण्याच्या दृष्टीकोणातून निधी उपलब्ध करून दिला. शिवाय धोरणात्मक निर्णय घेतले. त्या दृष्टीकोणातून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या मत्यस्य व्यवसायिकांना मदत करणे आवश्यक आहे.४निलक्रांती योजनेतर्गत मत्स्य व्यवसायिकांना साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय १६ आॅक्टोबर रोजी राज्याच्या कृषी, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने घेतला. त्या प्रमाणे येलदरी येथील मत्स्य व्यवसायावर अवलंबून असणाºयांना मदत करावी, अशी मागणी मत्स्य व्यवसायिकांकडून होऊ लागली आहे. या खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पिकांना मिळेना पाणीयेलदरी धरणातील पाण्यावर जवळपास ६० हजार हेक्टरवरील पिकांना पाणी देण्याचे नियोजन होेते;परंतु, धरण मृतसाठ्यात असल्याने खरीप व रबी हंगामातील पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून हिच परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.खडकपूर्णा ठरतोय अडथळा पाणीसाठा होत नसल्याने अडचण४येलदरी धरणाच्या वरच्या भागात बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा येथे पूर्णा नदीवरच धरण बांधण्यात आले आहे. २०१३ पासून येलदरी धरणात येणाºया पाण्याचा वेग कमी झाला आहे.४परिणामी येलदरी धरणावर अवलंबून असलेले ६० हजार हेक्टरवरील शेती सिंचन क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, पिण्याच्या पाणीपुरवठा योजना, मत्स्य व्यवसाय यासह धरणावरून अवलंबून असलेले सर्व व्यवसाय धोक्यात आले आहेत.४नदीमधील पाणी खडकपूर्णामधेच आडविले जात असल्याने येलदरी धरणाच्या पाणी साठविण्याठी खात्री देणे आता आवघड झाले आहे.४यावर्षी तर धरण परिसरात पाऊस न झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे केवळ ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मच्छीमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीyelgao damयेळगाव धरणWaterपाणी