शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

परभणी : ४० हजार युवकांनी दिली चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:46 IST

भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ ते १३ जानेवारी या काळात भारतीय सैन्य भरती प्रक्रिया पार पडली़ सैन्य भरतीच्या निमित्ताने राज्यातील ९ जिल्ह्यांमधून हजारो युवक दररोज परभणी शहरात दाखल होत होते़ सैन्य दलातील सोल्जर टेक्नीकल, सोल्जर जनरल ड्युटी आणि ट्रेडसमन या तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली़ राज्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि बुलडाणा ९ जिल्ह्यांसाठी परभणी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून परभणी शहरात या भरती प्रक्रियेचे आयोजन केले होते़ १० दिवसांमध्ये ८ जानेवारीचा एक दिवस वगळता दररोज रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या़ या शारीरिक चाचण्यामध्ये धावणे, लांब उडी, नागमोडी वाटांवरून चालणे अशा अवघड कसरती उमेदवारांकडून करून घेण्यात आल्या़ विशेष म्हणजे रात्री १२ वाजेपासून या भरती प्रक्रियेला प्रारंभ होत होता़ त्यामुळे रात्रभर उमेदवारांना जागरण करावे लागले़ याच काळात वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता़ अशा थंडगार वातावरणात उमेदवारही देखील जिद्दीने भरती प्रक्रियेला सामोरे गेले़१३ जानेवारी रोजी या भरती प्रक्रियेची सांगता झाली़ या काळामध्ये किती उमेदवारांची शारीरिक चाचणी? किती उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी निवडले गेले? या विषयी उत्सुकता लागली होती़ भरती प्रक्रियेचे संचालक असलेले कर्नल तरुण जामवाल यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले, परभणी जिल्ह्यात होणाºया या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन ६५ हजार युवकांनी अर्ज दाखल केले होते़ या सर्व उमेदवारांना भरतीसाठी आॅनलाईन प्रवेश पत्रही देण्यात आले़ ९ दिवसांच्या काळात ४० हजार ५०० उमेदवारांची प्रत्यक्ष शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे़ या शारीरिक चाचणीतून सुमारे ४ हजार विद्यार्थी वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले असून, अजूनही त्यात वाढ होत आहे़ वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र दिले जाणार आहे़ २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे ही लेखी परीक्षा होणार असल्याचे जामवाल यांनी सांगितले़ एकंदर या प्रक्रियेमुळे परभणी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते़कोल्हापूरपेक्षाही परभणीत मिळाला चांगला प्रतिसाद४परभणी येथील भरती प्रक्रियेपूर्वी कोल्हापूर येथे सैन्य दलाची भरती प्रक्रिया पार पडली आहे़ मात्र कोल्हापूरच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात सैन्य भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला़ तसेच मागील भरतीच्या तुलनेत यावर्षी सैन्य दलात दाखल होण्याची इच्छा बाळगणाºया उमेदवारांची संख्या वाढली आहे़ विशेष म्हणजे अनेक उमेदवारांनी धावण्याची चाचणी वेळेत पूर्ण केली़ त्यावरून हे उमेदवार पूर्ण तयारीनिशी भरती प्रक्रियेसाठी आल्याचेही या संपूर्ण प्रक्रियेवरून लक्षात येते़ परभणीतील वातावरण चांगले आहे़ जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले नाहीत़ त्यांच्यात किमान शिस्तीचे वातावरण रुजले जाणार असून, या उमेदवारांनी या पुढेही चांगली तयारी करावी, असे आवाहन मेजर विजय पिंगळे यांनी केले़चार वर्षानंतर भरती प्रक्रियापरभणी जिल्ह्यात यापूर्वी २०१४ मध्ये सैन्य दलाची भरती प्रक्रिया पार पडली़ त्यानंतर ४ वर्षानंतर ही भरती प्रक्रिया घेण्यात आली़ येथून पुढे दर तीन वर्षांनी परभणीत सैन्य भरती होणार असल्याने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSoldierसैनिक