शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

परभणी : ४० हजार युवकांनी दिली चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:46 IST

भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ ते १३ जानेवारी या काळात भारतीय सैन्य भरती प्रक्रिया पार पडली़ सैन्य भरतीच्या निमित्ताने राज्यातील ९ जिल्ह्यांमधून हजारो युवक दररोज परभणी शहरात दाखल होत होते़ सैन्य दलातील सोल्जर टेक्नीकल, सोल्जर जनरल ड्युटी आणि ट्रेडसमन या तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली़ राज्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि बुलडाणा ९ जिल्ह्यांसाठी परभणी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून परभणी शहरात या भरती प्रक्रियेचे आयोजन केले होते़ १० दिवसांमध्ये ८ जानेवारीचा एक दिवस वगळता दररोज रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या़ या शारीरिक चाचण्यामध्ये धावणे, लांब उडी, नागमोडी वाटांवरून चालणे अशा अवघड कसरती उमेदवारांकडून करून घेण्यात आल्या़ विशेष म्हणजे रात्री १२ वाजेपासून या भरती प्रक्रियेला प्रारंभ होत होता़ त्यामुळे रात्रभर उमेदवारांना जागरण करावे लागले़ याच काळात वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता़ अशा थंडगार वातावरणात उमेदवारही देखील जिद्दीने भरती प्रक्रियेला सामोरे गेले़१३ जानेवारी रोजी या भरती प्रक्रियेची सांगता झाली़ या काळामध्ये किती उमेदवारांची शारीरिक चाचणी? किती उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी निवडले गेले? या विषयी उत्सुकता लागली होती़ भरती प्रक्रियेचे संचालक असलेले कर्नल तरुण जामवाल यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले, परभणी जिल्ह्यात होणाºया या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन ६५ हजार युवकांनी अर्ज दाखल केले होते़ या सर्व उमेदवारांना भरतीसाठी आॅनलाईन प्रवेश पत्रही देण्यात आले़ ९ दिवसांच्या काळात ४० हजार ५०० उमेदवारांची प्रत्यक्ष शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे़ या शारीरिक चाचणीतून सुमारे ४ हजार विद्यार्थी वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले असून, अजूनही त्यात वाढ होत आहे़ वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र दिले जाणार आहे़ २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे ही लेखी परीक्षा होणार असल्याचे जामवाल यांनी सांगितले़ एकंदर या प्रक्रियेमुळे परभणी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते़कोल्हापूरपेक्षाही परभणीत मिळाला चांगला प्रतिसाद४परभणी येथील भरती प्रक्रियेपूर्वी कोल्हापूर येथे सैन्य दलाची भरती प्रक्रिया पार पडली आहे़ मात्र कोल्हापूरच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात सैन्य भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला़ तसेच मागील भरतीच्या तुलनेत यावर्षी सैन्य दलात दाखल होण्याची इच्छा बाळगणाºया उमेदवारांची संख्या वाढली आहे़ विशेष म्हणजे अनेक उमेदवारांनी धावण्याची चाचणी वेळेत पूर्ण केली़ त्यावरून हे उमेदवार पूर्ण तयारीनिशी भरती प्रक्रियेसाठी आल्याचेही या संपूर्ण प्रक्रियेवरून लक्षात येते़ परभणीतील वातावरण चांगले आहे़ जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले नाहीत़ त्यांच्यात किमान शिस्तीचे वातावरण रुजले जाणार असून, या उमेदवारांनी या पुढेही चांगली तयारी करावी, असे आवाहन मेजर विजय पिंगळे यांनी केले़चार वर्षानंतर भरती प्रक्रियापरभणी जिल्ह्यात यापूर्वी २०१४ मध्ये सैन्य दलाची भरती प्रक्रिया पार पडली़ त्यानंतर ४ वर्षानंतर ही भरती प्रक्रिया घेण्यात आली़ येथून पुढे दर तीन वर्षांनी परभणीत सैन्य भरती होणार असल्याने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSoldierसैनिक