शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

परभणी: पालिकेच्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:31 IST

सध्या शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना शहरातील सिध्दार्थनगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे; परंतु, याकडे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): सध्या शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना शहरातील सिध्दार्थनगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे; परंतु, याकडे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.पूर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून पालिका परिसरात २ तर सिद्धार्थ नगर परिसरात १ असे एकूण ३ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी या जलकुंभात साठवले जाते. मागील दीड महिन्यांपूर्वी शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने सिद्धेशवर जलाशयातून ०.५ दलघमी पाणी पूर्णा शहराला पिण्यासाठी सोडण्यात आले होते. सद्य स्थितीत शहरात पालिकेकडून आठवड्यातूून एकवेळा पाणीपुरवठा केला जातो. तर दुसरीकडे कोल्हापुरी बंधाºयातील पाणीसाठा हळूहळू कमी होत चालला आहे.शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना सिद्धार्थनगर भागातील या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभाची पाणी साठवण क्षमता २ लाख लिटर आहे. जलकुंभातून गळती झालेले पाणी परिसरातील खोलगट भागात साचल्याने त्या परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. साचलेल्या पाण्यात दररोज महिला धुणे धुताना तर बालगोपाल पोहण्याचा आनंद घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई