शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बॉम्ब बाळगणाऱ्यांना देशभक्त ठरविले जातेय - कन्हैय्याकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी ( परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोजित सभेत बोलताना केला.पाथरी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोजित सभेत बोलताना केला.पाथरी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत कन्हैय्याकुमार बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, परभणीच्या महापौर मीनाताई वरपूडकर, नगराध्यक्षा मीना भोरे, भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, ह.भ.प. सारंगधर महाराज, दादासाहेब टेंगसे, मुंजाजी भाले, राजीव पामे, अनिल नखाते, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, तुकाराम जोगदंड, दशरथ सूर्यवंशी, तबरेज खान दुर्राणी, जुनैद खान दुर्राणी, एकनाथ शिंदे, अशोक गिराम, कॉ.राजन क्षीरसागर, लिंबाजी कचरे, राजेश ढगे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, देशात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला; परंतु, कर्मचाºयांच्या वेतनामध्ये वाढ होण्याऐवजी कमी वेतन झाले आहे, ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांचा कालावधी मागितला होता. नोटाबंदीने नक्षलवादी चळवळी थांबल्या जातील, अतिरेक्यांचे कंबरडे मोडेल, असा दावा केला गेला होता. आता नोटाबंदीला अनेक महिने उलटले आहेत तरीही रोजच देशाच्या सिमेवर जवान अतिरेक्यांसोबत लढताना शहीद होत आहेत. याचे उत्तर आता पंतप्रधानांकडे नाही. देशात आज घरामध्ये बॉम्ब बाळगणाºयांना देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही ठरविले जात असल्याचा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार याने केला. यावेळी बोलताना आ.दुर्राणी म्हणाले की, भारतीय संविधान सुरक्षित राहिले तर देश सुरक्षित राहील. संविधानामुळेच सर्वांना समान प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी बोलताना वरपूडकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाचे धोरण सर्व सामान्यांच्या हिताविरोधात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपाला विरोध केला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुजाहेद खान यांनी तर सूत्रसंचालन अ‍ॅड. अमोल गिराम यांनी केले. कार्यक्रमास मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीkanhaiya kumarकन्हैय्या कुमार