शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

परभणी : बॉम्ब बाळगणाऱ्यांना देशभक्त ठरविले जातेय - कन्हैय्याकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी ( परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोजित सभेत बोलताना केला.पाथरी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोजित सभेत बोलताना केला.पाथरी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत कन्हैय्याकुमार बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, परभणीच्या महापौर मीनाताई वरपूडकर, नगराध्यक्षा मीना भोरे, भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, ह.भ.प. सारंगधर महाराज, दादासाहेब टेंगसे, मुंजाजी भाले, राजीव पामे, अनिल नखाते, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, तुकाराम जोगदंड, दशरथ सूर्यवंशी, तबरेज खान दुर्राणी, जुनैद खान दुर्राणी, एकनाथ शिंदे, अशोक गिराम, कॉ.राजन क्षीरसागर, लिंबाजी कचरे, राजेश ढगे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, देशात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला; परंतु, कर्मचाºयांच्या वेतनामध्ये वाढ होण्याऐवजी कमी वेतन झाले आहे, ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांचा कालावधी मागितला होता. नोटाबंदीने नक्षलवादी चळवळी थांबल्या जातील, अतिरेक्यांचे कंबरडे मोडेल, असा दावा केला गेला होता. आता नोटाबंदीला अनेक महिने उलटले आहेत तरीही रोजच देशाच्या सिमेवर जवान अतिरेक्यांसोबत लढताना शहीद होत आहेत. याचे उत्तर आता पंतप्रधानांकडे नाही. देशात आज घरामध्ये बॉम्ब बाळगणाºयांना देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही ठरविले जात असल्याचा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार याने केला. यावेळी बोलताना आ.दुर्राणी म्हणाले की, भारतीय संविधान सुरक्षित राहिले तर देश सुरक्षित राहील. संविधानामुळेच सर्वांना समान प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी बोलताना वरपूडकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाचे धोरण सर्व सामान्यांच्या हिताविरोधात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपाला विरोध केला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुजाहेद खान यांनी तर सूत्रसंचालन अ‍ॅड. अमोल गिराम यांनी केले. कार्यक्रमास मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीkanhaiya kumarकन्हैय्या कुमार