शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

परभणी : वझर येथील चोरटी वाळू वाहतूक थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:46 IST

तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़वाळू चोरट्यांनी निवडणुकीचा फायदा घेऊन लाखो रुपयांच्या वाळुचा अवैध उपसा केला़ जिंतूर, परतूर, मंठा या तालुक्यातील वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून लागली़ पूर्णा नदीपात्राच्या वाळुचा लिलाव झाला नसतानाही ज्या ठिकाणचा लिलाव झाला आहे, त्या ठिकाणच्या पावत्या वापरून वझरमधील काही वाळूचोर पूर्णा नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत़महसूल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची यास छुपी साथ असल्याचे दिसून येत आहे़ विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर वाळू मिळत असल्याने अचानक एवढी वाळू येते कोठून आली? असा प्रश्नही पडत आहे़ तालुक्यातील डिग्रस, पाचलेगाव, येसेगाव यासह अनेक भागांतून वाळू उपसा होत आहे़प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे़ तालुक्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नाही़ मात्र वझर भागातीलच पूर्णा नदीच्या देवठाणा येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पावत्या वापरून नदीतील अन्य ठिकाणावरून वाळू उपसा केला जात आहे. ही बाब महसूल प्रशासनाला माहीत असतानाही कारवाई होत नसल्याने नदीकाठावरील गावांतून आश्चर्य व्यक्त होत आहे़ महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वाळूचे भाव घसरलेवझर परिसरातील देवठाणा पॉर्इंट भागातील वाळू ठेका निघाल्याने वाळूचे भाव गडगडले आहेत. २६ हजार रुपयांना ४ ब्रास मिळणारी वाळू आता १६ हजार रुपयांना मिळत आहे़ एका वाळू घाटातून किती वाळू उपसा होतो, याकडे लक्ष देण्यास महसूल प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ठिक ठिकाणी नेमली माणसेजिंतूर तालुक्यातील वझर व परिसरातील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस बेसुमार वाळुचा उपसा होत आहे़ या वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी पथक निघाले असता वाळूमाफियांनी ठिक ठिकाणी आपली माणसे बसविली आहेत़ या माणसांद्वारे माहिती मिळताच हे वाळूमाफिया प्रशासनाचे पथक येईपर्यंत गायब होतात़ त्यामुळे प्रशासनाच्या हाती काहीच लागत नाही़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे़रात्रीच्या वेळीही नदीपात्रातून वाळू उपसावाळू घाटांचा लिलाव झाल्यानंतर रात्रीच्या वेळी वाळू उपसा करता येत नाही़ परंतु, वझर भागामध्ये रात्री ७ ते सकाळी ६ यावेळेत हजारो ब्रास वाळुचा उपसा होतो़ विशेष म्हणजे जेसीबीच्या सहाय्याने हा वाळू उपसा होत असल्याने महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे़ त्यातच वाळू लिलाव झालेली एक पावती फाडून तिचा अनेक ठिकाणी वापर केला जातो़ वाळूमाफिया रात्री-अपरात्री वाळू उपसा करीत आहे़ याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग