शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

परभणी : वझर येथील चोरटी वाळू वाहतूक थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:46 IST

तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़वाळू चोरट्यांनी निवडणुकीचा फायदा घेऊन लाखो रुपयांच्या वाळुचा अवैध उपसा केला़ जिंतूर, परतूर, मंठा या तालुक्यातील वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून लागली़ पूर्णा नदीपात्राच्या वाळुचा लिलाव झाला नसतानाही ज्या ठिकाणचा लिलाव झाला आहे, त्या ठिकाणच्या पावत्या वापरून वझरमधील काही वाळूचोर पूर्णा नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत़महसूल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची यास छुपी साथ असल्याचे दिसून येत आहे़ विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर वाळू मिळत असल्याने अचानक एवढी वाळू येते कोठून आली? असा प्रश्नही पडत आहे़ तालुक्यातील डिग्रस, पाचलेगाव, येसेगाव यासह अनेक भागांतून वाळू उपसा होत आहे़प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे़ तालुक्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नाही़ मात्र वझर भागातीलच पूर्णा नदीच्या देवठाणा येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पावत्या वापरून नदीतील अन्य ठिकाणावरून वाळू उपसा केला जात आहे. ही बाब महसूल प्रशासनाला माहीत असतानाही कारवाई होत नसल्याने नदीकाठावरील गावांतून आश्चर्य व्यक्त होत आहे़ महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वाळूचे भाव घसरलेवझर परिसरातील देवठाणा पॉर्इंट भागातील वाळू ठेका निघाल्याने वाळूचे भाव गडगडले आहेत. २६ हजार रुपयांना ४ ब्रास मिळणारी वाळू आता १६ हजार रुपयांना मिळत आहे़ एका वाळू घाटातून किती वाळू उपसा होतो, याकडे लक्ष देण्यास महसूल प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ठिक ठिकाणी नेमली माणसेजिंतूर तालुक्यातील वझर व परिसरातील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस बेसुमार वाळुचा उपसा होत आहे़ या वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी पथक निघाले असता वाळूमाफियांनी ठिक ठिकाणी आपली माणसे बसविली आहेत़ या माणसांद्वारे माहिती मिळताच हे वाळूमाफिया प्रशासनाचे पथक येईपर्यंत गायब होतात़ त्यामुळे प्रशासनाच्या हाती काहीच लागत नाही़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे़रात्रीच्या वेळीही नदीपात्रातून वाळू उपसावाळू घाटांचा लिलाव झाल्यानंतर रात्रीच्या वेळी वाळू उपसा करता येत नाही़ परंतु, वझर भागामध्ये रात्री ७ ते सकाळी ६ यावेळेत हजारो ब्रास वाळुचा उपसा होतो़ विशेष म्हणजे जेसीबीच्या सहाय्याने हा वाळू उपसा होत असल्याने महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे़ त्यातच वाळू लिलाव झालेली एक पावती फाडून तिचा अनेक ठिकाणी वापर केला जातो़ वाळूमाफिया रात्री-अपरात्री वाळू उपसा करीत आहे़ याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग