शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

परभणी : राईनपाडा घटनेची तृतीयपंथीयांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:33 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आले़ ओळखपत्रासह आलेल्या या तृतीयपंथीयांच्या चेहºयावर राईनपाडा घटनेची धास्ती शनिवारी प्रथमच पहावयास मिळाली़

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आले़ ओळखपत्रासह आलेल्या या तृतीयपंथीयांच्या चेहºयावर राईनपाडा घटनेची धास्ती शनिवारी प्रथमच पहावयास मिळाली़मुले पळविणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा राज्यभरात पसरल्यानंतर निष्पाप लोकांना मारहाण करण्याचे प्रकार परभणी जिल्ह्यासह राज्यभरात घडू लागले़ अनोळखी माणूस शहरात दाखल झाल्यानंतर त्याच्याकडे संशयाने बघितले जात आणि या संशयातूनच हजारो जमावांचा बळी पडण्याची वेळ भटकंती करणाºया समाजावर आली होती़ यातूनच धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे गोसावी समाजातील पाच जणांची जमावाने ठेचून हत्या केली होती़ या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता़ भटकंती करणाºया सर्वच समाजावर घटनेचे खोलवर परिणाम झाले असून, त्याचा अनुभव शनिवारी सेलू शहरामध्ये आला़शनिवारी सेलू शहराचा आठवडी बाजार भरतो़ या बाजारपेठेत तालुक्यातील गावांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात़ दिवसभर होणारी गर्दी लक्षात घेऊन जालना शहरातून तृतीयपंथी दर शनिवारी सेलू शहरात दाखल होतात़ बाजारपेठेत फिरुन हे तृतीय पंथी पैसे जमा करतात़ मागील अनेक वर्षांपासूनच त्यांचा हा नित्यनियम आहे़ तालुक्यातील इतर गावांमध्येही ते फिरतात़ १४ जुलै रोजी दुपारी हे तृतीयपंथी सेलू शहरात दाखल झाले़ बाजारपेठेत येत असताना एक गोष्ट प्रकर्षाने डोळ्यात भरत होती ती म्हणजे प्रत्येक तृतीय पंथीयाने गळ्यात ओळखपत्र अडविले होते़ या ओळखपत्रावर त्यांचे नाव, पत्ता असा मजकूर लिहिला होता़ प्रथमच ओळखपत्र घेऊन भटकंती करणारे तृतीयपंथी पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटले़ बाजारकरूंसाठी हा अश्चर्याचा विषय असला तरी या तृतीयपंथीयांमध्ये राईनपाडा घटनेची धास्ती असल्याचे त्यांच्या चेहºयावरून जाणवत होते़ या घटनेची पुनरावृत्ती होवू नये, अनोळखी माणसाला आपली ओळख पटावी, या उद्देशानेच तृतीय पंथीयांनी हे पाऊल उचलले असावे़ या तृतीयपंथीयांपैकी एकाशी संवाद साधला तेव्हा त्यानेही या गोष्टीला पुष्टी दिली़ आम्ही गुन्हेगार नसून पोटासाठी भटकंती करीत आहोत; परंतु, अनाहूतपणे आमच्यावरही राईनपाडासारखी वेळ येऊ नये़ त्यामुळेच ओळखपत्राची सुविधा केली असल्याचे त्यांनी सांगितले़नगरसेवकांचे ओळखपत्रसंशयावरून तृतीयपंथीयांना मारहाण होऊ नये़ अशी काही वेळ आलीच तर त्यांना स्वत:चा पत्ता किंवा ओळख पटविण्यासाठी काही तरी जवळ असावे, या उद्देशाने जालना येथील नगरसेवकांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या सही शिक्क्यानिशी त्यांना ओळखपत्र पुरविले आणि हेच ओळखपत्र भटकंती करताना तृतीयपंथीयांसाठी आधार ठरू लागले आहे़

 

टॅग्स :parabhaniपरभणीDhuleधुळे