शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

परभणी : वाळू घाट खरेदीकडे कंत्राटदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:18 IST

जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़यावर्षी जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडले होते़ हरित लवादाची परवानगी न मिळाल्याने ही प्रक्रिया ठप्प होती़ फेब्रुवारी महिन्यात राज्य हरित समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर ३३ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ विशेष म्हणजे त्यातील केवळ ११ वाळू घाट कंत्राटदारांनी खरेदी केले असून, उर्वरित वाळू घाटांची प्रक्रिया रखडली आहे़ लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत खरेदी न झालेल्या वाळू घाटांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु, तीनही वेळा वाळू घाटांच्या खरेदीसाठी कंत्राटदार फिरकले नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांची प्रक्रिया रखडली आहे़ सद्यस्थितीत निर्माण झालेली वाळुची टंचाई लक्षात घेता हे वाळू घाट लिलावाद्वारे वाळू उपस्यासाठी खुले होणे आवश्यक आहे़ शासनाच्या नियमानुसार तीनपेक्षा अधिक वेळा लिलाव प्रक्रिया केल्यानंतरही विक्री होत नसेल तर त्या घाटांची किंमत कमी करण्याची तरतूद आहे़ या तरतुदीनुसार १३ वाळूघाटांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले असून, तेराही वाळू घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी केल्यास या घाटांचे लिलाव होण्याची शक्यता आहे़, असे नमूद केले असून, घाटांची किंमत कमी करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़गोदावरी, दूधना, पूर्णा या तीन नद्यांवरील वाळू घाटांचे लिलाव करून त्या ठिकाणावरून वाळुचा अधिकृत उपसा केला जातो़ या वर्षात केवळ ११ घाटांचेच लिलाव झाले आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आर्थिक फटका तर सहन करावा लागतच आहे़ या शिवाय सामान्य नागरिकांना वाळू उपलब्ध होत नाही़ जास्तीत जास्त वाळू घाट खुले झाले तर वाळुची किंमत कमी होऊन बांधकाम व्यावसाय वाढीस लागू शकतो़ या सर्व पार्श्वभूमीवर १३ वाळू घाटांचे फेरलिलाव होण्याची शक्यता आहे़गोदावरी नदीवरील: १२ घाटपरभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या वाळुला मागणी आहे़ मात्र याच नदीच्या पात्रावरील वाळू घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही़ सर्वाधिक घाट गोदावरी नदीवर असून, या घाटांच्या लिलावासाठी २५ टक्के रक्कम कमी करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली आहे़ या वाळू घाटांमध्ये पिंपळगाव सारंगी, पेनूर-१, पेनूर-२, कळगाव, बाणेगाव, खरबडा-२, पिंप्री झोला, महातपुरी, भांबरवाडी, खडका, लिंबा, थार आणि दूधना नदीकाठावरील सोन्ना येथील वाळू घाटांचा समावेश आहे़ या वाळू घाटांची मूळ किंमत कमी करून हे घाट पुन्हा लिलाव प्रक्रियेत समाविष्ट करावेत, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़४या वाळू घाटांमध्ये सुमारे ७४ हजार ३८२ ब्रास वाळू उपलब्ध आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला वाळू घाटात सर्वाधिक १० हजार ६०१ ब्रास वाळू उपलब्ध असून, पेनूर-१, पेनूर-२ येथे प्रत्येकी ८ हजार ४८१, कळगाव येथे ८ हजार ६५७, महातपुरी घाटात ८ हजार ४८१, पिंपळगाव सारंगी घाटात ६ हजार ८०२, भांबरवाडी घाटात ३ हजार १८०, लिंबा घाटात ५ हजार ३०० तर सोन्ना येथील घाटामध्ये ३ हजार ८७० ब्रास वाळू उपलब्ध आहे़जिल्ह्यातील वाळू घाटांच्या किंमती लाखांमध्ये असून, यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काही परिस्थितीचा परिणामही लिलावावर झाला आहे़ त्याच प्रमाणे लिलावानंतर साधारण: २ ते ३ महिनेच वाळुचा उपसा करावा लागणार आहे़ त्यामुळे वाळू उपस्यातून फारसा फायदा होण्याची श्क्यता नसल्याने कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग