शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दहा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.परभणी जिल्ह्यातील औद्योगिक, घरगुती व वाणिज्य या ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वाढत आहे. ही थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने मुंबई येथील महावितरण मुख्यालयातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने विशेष १० वसुली पथकांची नेमणूक केली आहे. या पथकात औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड व परभणी येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परभणी शहराबरोबरच ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसह वीज चोरी करणाºया ग्राहकांची तीन दिवस झाडाझडती घेतली जाणार आहे.परभणी विभाग क्रमांक १ मध्ये लघुदाब प्रकारातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ५ हजार ६९६ वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१८ अखेर ११० कोटी ७५ लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर विभाग क्रमांक २ मधील ९८ हजार १८८ ग्राहकांकडे १३९ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे एकूण २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडे २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ कार्यालयाने जिल्ह्यासाठी नेमलेल्या एका- एका पथकामध्ये ५ ते १० अधिकाºयांचा समावेश आहे. ही दहाही पथके २९ आॅक्टोबर रोजी शहरात दाखल झाली.३० आॅक्टोबर रोजी या पथकांनी परभणी येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.वीज चोरीवर आळा घालण्यासाठी मोहीम४वीज बिल थकबाकी वसुल करण्याबरोबरच वीज चोरीवर आळा घालण्याच्या उद्देशाने २९ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या स्थैर्यासाठी वीज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. सणासुदीचे दिवस पाहता वीज ग्राहकांनीही चालू वीज बिलासह आपल्याकडे असलेली थकबाकी त्वरित भरुन वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.कृषीपंपांना वगळले४जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंपाच्या वीज बिलाची वसुली थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाने थकबाकी वसुलीसाठी नेमलेल्या पथकाकडून औद्योगिक, वाणिज्य व घरगुती वीज ग्राहकांचीच वसुली करण्यात येणार आहे. कृषीपंपांना या मोहिमेतून वगळल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणlaturलातूरNandedनांदेड