शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

परभणी : २५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दहा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.परभणी जिल्ह्यातील औद्योगिक, घरगुती व वाणिज्य या ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वाढत आहे. ही थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने मुंबई येथील महावितरण मुख्यालयातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने विशेष १० वसुली पथकांची नेमणूक केली आहे. या पथकात औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड व परभणी येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परभणी शहराबरोबरच ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसह वीज चोरी करणाºया ग्राहकांची तीन दिवस झाडाझडती घेतली जाणार आहे.परभणी विभाग क्रमांक १ मध्ये लघुदाब प्रकारातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ५ हजार ६९६ वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१८ अखेर ११० कोटी ७५ लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर विभाग क्रमांक २ मधील ९८ हजार १८८ ग्राहकांकडे १३९ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे एकूण २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडे २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ कार्यालयाने जिल्ह्यासाठी नेमलेल्या एका- एका पथकामध्ये ५ ते १० अधिकाºयांचा समावेश आहे. ही दहाही पथके २९ आॅक्टोबर रोजी शहरात दाखल झाली.३० आॅक्टोबर रोजी या पथकांनी परभणी येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.वीज चोरीवर आळा घालण्यासाठी मोहीम४वीज बिल थकबाकी वसुल करण्याबरोबरच वीज चोरीवर आळा घालण्याच्या उद्देशाने २९ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या स्थैर्यासाठी वीज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. सणासुदीचे दिवस पाहता वीज ग्राहकांनीही चालू वीज बिलासह आपल्याकडे असलेली थकबाकी त्वरित भरुन वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.कृषीपंपांना वगळले४जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंपाच्या वीज बिलाची वसुली थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाने थकबाकी वसुलीसाठी नेमलेल्या पथकाकडून औद्योगिक, वाणिज्य व घरगुती वीज ग्राहकांचीच वसुली करण्यात येणार आहे. कृषीपंपांना या मोहिमेतून वगळल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणlaturलातूरNandedनांदेड