शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

परभणी : कोट्यावधींच्या मालमत्तेची दूरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:33 IST

तालुक्यातील जीवन प्राधिकरणाच्या तीन मोठ्या योजना बंद पडल्या असून या योजनेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेवारस अवस्थेत गंजत आहे. योजनेचे पाणी तर गावात आलेच नाही. मात्र या योजनेवर खर्च झाल्याने दुसरी योजना मंजूर होत नसल्याने ५१ गावांना वेठीस धरल्या गेले आहे.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील जीवन प्राधिकरणाच्या तीन मोठ्या योजना बंद पडल्या असून या योजनेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेवारस अवस्थेत गंजत आहे. योजनेचे पाणी तर गावात आलेच नाही. मात्र या योजनेवर खर्च झाल्याने दुसरी योजना मंजूर होत नसल्याने ५१ गावांना वेठीस धरल्या गेले आहे.जिंतूर तालुक्यात २००४-०५ या वर्षी येलदरी जलशायातून २३ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेवर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आला.योजनेतील अक्षम्य चुका, नियोजनाचा अभाव व योजना हस्तांतरित न झाल्याने या योजनेचे पाणी गावात पोहचलेच नाही. या योजनेच्या मोटार बंद अवस्थेत असल्याने त्यांच्यावर गंज चढला आहे. येलदरी परिसरात हे साहित्य पडून आहे. कुºहाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वापर ग्रामस्थ शौचालयासाठी करीत आहेत.बारा गाव योजनचेही हेच हाल आहेत. सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटवर ही योजना चालते. योजनेचे पाणी सुरुवातीच्या दोन वर्षात पाच ते सहा गावांपर्यंत पोहचले; परंतु, लगेच या योजनेत तांत्रिक बिघाड होऊन ही योजना बंद झाली. या योजनेचे भले मोेठे जलशुद्धीकरण केंद्र जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथे आहे. जे बेवारस अवस्थेत पडून आहे. निवळी धरणातून १६ गाव कुपटा योजनेलाही अखेर घरघर लागली आहे. या योजनेवर बोरी, कौसडी व अनेक मोठी गावे आहेत. या योजनेवर १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. योजनेचे पाणी काही काळ चार ते पाच गावांना मिळत होते. मात्र मागील दोन वर्षांपासून हे वीज बिल न भरल्यामुळे योजनाच बंद पडली आहे.जलशुद्धीकरण केंद्र बनले शौचालय२३ गाव पिंपळगाव काजळे पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र कुºहाडी येथे आहे. या केंद्राचा वापर गावातील ग्रामस्थ शौचालयासाठी करीत आहेत. तसेच अवैध धंदे, जुगार व दारू पिणाऱ्यांचा अड्डा हे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे चोहू बाजूने साचलेली घाण व गवत यामुळे हे केंद्र रोगराईचे केंद्र बनले आहे. या केंद्रातील लाखो रुपयांचे साहित्य, मशिनरी धूळ खात पडून आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater shortageपाणीटंचाई