शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:04 IST

दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २६ एप्रिल रोजी पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ या प्रसंगी रस्तोगी बोलत होते़ कार्यक्रमास कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, अकोला येथून डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ विकास भाले, हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ़ रवींद्र चारी, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे व्यवस्थापक डॉ़ एऩपी़ सिंग, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, डॉ़डी़एम़ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती़रस्तोगी म्हणाले, कमी पर्जन्यमानात रुंद वरंबा व सरी पद्धतीने पिकांची लागवड केल्यास मृद व जलसंवर्धन होऊन चांगले उत्पादन घेता येते़ त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्तार कार्यकर्ते व शेतकºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ कमी पाण्यात फळबाग व्यवस्थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असून, ते शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे़मराठवाडा व विदर्भात खरिपातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे़; परंतु, ज्वारीचे पीक पाण्याचा ताण सहन करणारे असून, मानवास अन्न आणि जनावरांना चारा पुरविणारे असल्याने ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत़बीटी कपाशी ऐवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली केल्यास कमीत खर्चात शाश्वत उत्पादन घेता येईल़ तंत्रज्ञानाच्या आधारे शेतमालाचे उत्पादन वाढू शकेल़ शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी योग्य बाजारभाव, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणूक व विपणन व्यवस्था आदींचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे़, असे ते म्हणाले़पोक्रा अंतर्गत गावांत कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शेती शाळेचे आयोजन केले जाणार आहे़ प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावसमुहातील प्रत्येक गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व ग्रामसंजीवनी समितीद्वारे गावामध्ये हाती घ्यावयाच्या उपाययोजनांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी डॉ़ अशोक ढवण, डॉ़ विलास भाले, डॉ़चारी, डॉ़ सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ डॉ़ आऱएऩ खंदारे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़विजय कोळेकर यांनी आभार मानले़ कार्यशाळेस परभणी, अकोला, राहुरी कृषी विद्यापीठातील तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मुंबई येथील आयआयटी, कृषी विभागातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़५ हजार गावांमध्ये प्रकल्प४पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सध्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांसह राज्यातील ५ हजार १४२ गावांत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे़४या प्रकल्पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारशी व हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीuniversityविद्यापीठ