शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:04 IST

दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २६ एप्रिल रोजी पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ या प्रसंगी रस्तोगी बोलत होते़ कार्यक्रमास कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, अकोला येथून डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ विकास भाले, हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ़ रवींद्र चारी, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे व्यवस्थापक डॉ़ एऩपी़ सिंग, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, डॉ़डी़एम़ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती़रस्तोगी म्हणाले, कमी पर्जन्यमानात रुंद वरंबा व सरी पद्धतीने पिकांची लागवड केल्यास मृद व जलसंवर्धन होऊन चांगले उत्पादन घेता येते़ त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्तार कार्यकर्ते व शेतकºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ कमी पाण्यात फळबाग व्यवस्थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असून, ते शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे़मराठवाडा व विदर्भात खरिपातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे़; परंतु, ज्वारीचे पीक पाण्याचा ताण सहन करणारे असून, मानवास अन्न आणि जनावरांना चारा पुरविणारे असल्याने ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत़बीटी कपाशी ऐवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली केल्यास कमीत खर्चात शाश्वत उत्पादन घेता येईल़ तंत्रज्ञानाच्या आधारे शेतमालाचे उत्पादन वाढू शकेल़ शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी योग्य बाजारभाव, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणूक व विपणन व्यवस्था आदींचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे़, असे ते म्हणाले़पोक्रा अंतर्गत गावांत कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शेती शाळेचे आयोजन केले जाणार आहे़ प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावसमुहातील प्रत्येक गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व ग्रामसंजीवनी समितीद्वारे गावामध्ये हाती घ्यावयाच्या उपाययोजनांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी डॉ़ अशोक ढवण, डॉ़ विलास भाले, डॉ़चारी, डॉ़ सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ डॉ़ आऱएऩ खंदारे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़विजय कोळेकर यांनी आभार मानले़ कार्यशाळेस परभणी, अकोला, राहुरी कृषी विद्यापीठातील तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मुंबई येथील आयआयटी, कृषी विभागातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़५ हजार गावांमध्ये प्रकल्प४पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सध्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांसह राज्यातील ५ हजार १४२ गावांत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे़४या प्रकल्पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारशी व हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीuniversityविद्यापीठ