शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:25 IST

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या यापूर्वी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बदल्या होत होत्या; परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकात सातत्याने बदल केले जात आहेत. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच आता शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने ८ मार्च रोजी कक्ष अधिकारी एस. एन. भंडारकर यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आला आहे. त्यात बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा यांच्या संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १९ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करावयाचे आहे. २५ मार्चपासून प्रत्यक्ष शिक्षकांचे बदली अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व बाबी शिक्षकांना अवगत करण्यात याव्यात, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी ८ मार्च रोजीच ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिव प्रियदर्शना कांबळे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदल्यांबाबत जे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले, त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांची व्याख्या करताना संबंधित शिक्षकाची सर्वसाधारण व अवघड क्षेत्रात १० वर्षाची सेवा असल्यास सदरील शिक्षक बदलीपात्र होतात. मात्र सर्वसाधारण श्रेणीतील बदलीपात्र शिक्षक एकदा बदली झाल्यानंतर जोपर्यंत अवघड क्षेत्रात जात नाहीत, तोपर्यंत असे शिक्षक बदलीपात्र ठरतात. नवीन धोरणानुसार त्यांची प्रतिवर्षी बदली होऊ शकते. औरंगाबाद खंडपीठात शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने न्यायालयाने एक मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामध्ये बदलीपात्र शिक्षकाची नवीन धोरणानुसार प्रतिवर्षी बदली होऊ शकते. त्यामुळे त्या शिक्षकाला एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा बदली होण्यासाठी काही कालावधी निश्चित केला जाणार आहे काय, अशी विचारणा वकिलांना करण्यात आली होती. त्यावेळी शासनाच्या वतीने अशा बदलीपात्र शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा ३ वर्षे त्या शिक्षकाची बदली केली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले.आता ८ मार्चच्या आदेशात या व्याख्येत बदल करुन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे. त्यात बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाच्या बदलीस निश्चित करायवाची सेवा १० वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा किमान ३ वर्षे पूर्ण झाली आहे, असे शिक्षक बदलीपात्र ठरु शकतात, असेही ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांना अभय कायम४शिक्षक बदल्यांमध्ये संवर्ग १ व २ मधील ज्या शिक्षकांनी खोटी माहिती देऊन गतवर्षी बदली करुन घेतली. अशा शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करुन त्यांना त्यांच्या मूळ शाळेवर परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. जिल्ह्यात असे २४ शिक्षक गतवर्षी आढळून आले होते. त्यापैकी १० शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाई केली. उर्वरित १४ शिक्षकांना शिक्षण विभागाने गेल्या वर्षभरापासून अभय दिलेले आहे. या शिक्षकांवर कारवाई करण्याचे अधिकार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असताना परभणीतील मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुन्हा एकदा बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार आहे. गतवर्षीच कारवाई झाली नसल्याने पुन्हा खोटी माहिती देऊन बदलीचा खटाटोप होण्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळातून होताना दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकTransferबदली