शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

परभणी : शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:19 IST

शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.याबाबत अ‍ॅड. परिहार म्हणाले की, मनपातील स्वीकृत सदस्यपदाच्या एका जागेवर इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. याला विरोधी पक्षनेते विजय जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह १४ नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. तसे पत्रही प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. त्यामुळे इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना महिनाभरापूर्वी झालेल्या मनपाच्या विशेष सभेत अतिक इनामदार यांच्या नावास अचानक मंजुरी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्याच सांगण्यावरुन इनामदार यांची निवड करण्यात आली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे पत्र डावलून इतरांची निवड कशी काय केली, असा सवाल केला होता. त्यानंतर याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी पक्षविरोधी कृती करणाऱ्यांवर कारवाई करु, असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले होते. त्यानंतर जवळपास २० दिवसांचा कालावधी होत आला तरीही या प्रकरणी कारवाई होत नसल्याने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असल्याचे अ‍ॅड. परिहार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा पडली फूटराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. आ.दुर्राणी हे परभणी शहरात अकारण हस्तक्षेप करतात, नगरसेवकांना काम करु देत नाहीत, असा अ‍ॅड.परिहार यांचा आरोप आहे. तर आ.दुर्राणी हे जिल्हाध्यक्ष असल्याने निर्णय घेत असल्याचे सांगत आहेत. यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीत जिल्ह्यात फूट पडल्याचे दिसून येत आहे.प्रमुख पदाधिकाºयांच्या मागणीची दखल घेतली जात नसेल आणि पदाला सन्मान दिला जात नसेल तर त्या पदावर राहून उपयोग काय? पक्ष स्थापनेपासून खा.शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सोबत आहे. यापुढेही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहणार आहे.-अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार

टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण