शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

परभणी : शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:19 IST

शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.याबाबत अ‍ॅड. परिहार म्हणाले की, मनपातील स्वीकृत सदस्यपदाच्या एका जागेवर इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. याला विरोधी पक्षनेते विजय जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह १४ नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. तसे पत्रही प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. त्यामुळे इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना महिनाभरापूर्वी झालेल्या मनपाच्या विशेष सभेत अतिक इनामदार यांच्या नावास अचानक मंजुरी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्याच सांगण्यावरुन इनामदार यांची निवड करण्यात आली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे पत्र डावलून इतरांची निवड कशी काय केली, असा सवाल केला होता. त्यानंतर याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी पक्षविरोधी कृती करणाऱ्यांवर कारवाई करु, असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले होते. त्यानंतर जवळपास २० दिवसांचा कालावधी होत आला तरीही या प्रकरणी कारवाई होत नसल्याने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असल्याचे अ‍ॅड. परिहार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा पडली फूटराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. आ.दुर्राणी हे परभणी शहरात अकारण हस्तक्षेप करतात, नगरसेवकांना काम करु देत नाहीत, असा अ‍ॅड.परिहार यांचा आरोप आहे. तर आ.दुर्राणी हे जिल्हाध्यक्ष असल्याने निर्णय घेत असल्याचे सांगत आहेत. यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीत जिल्ह्यात फूट पडल्याचे दिसून येत आहे.प्रमुख पदाधिकाºयांच्या मागणीची दखल घेतली जात नसेल आणि पदाला सन्मान दिला जात नसेल तर त्या पदावर राहून उपयोग काय? पक्ष स्थापनेपासून खा.शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सोबत आहे. यापुढेही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहणार आहे.-अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार

टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण