शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी : ४२ कोटींचे अनुदान बँक खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:44 IST

जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२ कोटी १२ लाख रुपयांपैकी ४१ कोटी ९६ लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२ कोटी १२ लाख रुपयांपैकी ४१ कोटी ९६ लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकºयांनी घेतलेल्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. परिणामी कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. या शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने अनुदान देऊ केले आहे. तीन टप्प्यामध्ये अनुदानाचे वाटप होणार असून ४२ कोटी १२ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला होता. तहसील कार्यालयामार्फत ही रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून शेतकºयांच्या खात्यानुसार ती प्रत्यक्ष शेतकºयांना मिळणार आहे. बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या यादीनुसार परभणी तालुक्याला ६ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपये मिळाले होते. १२ हजार १७ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ८७ लाख ८७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. सेलू तालुक्यासाठी ६ कोटी ५९ लाख ८० हजार रुपये मिळाले होते. त्यापैकी १३ हजार ७८९ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ५३ लाख ७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जिंतूर तालुक्यात ११ हजार ९०१ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ४३ लाख ७ हजार, पाथरी तालुक्यातील १० हजार २९५ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी २१ लाख ९१ हजार, मानवत तालुक्यातील ९ हजार ४८९ शेतकºयांच्या खात्यावर ५ कोटी २७ लाख ४४ हजार, सोनपेठ तालुक्यात ८ हजार ८४३ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी २० लाख, गंगाखेड ७ हजार ९११ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी २४ लाख ७३ हजार, पालम ७ हजार २७१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी ४ लाख २५ हजार आणि पूर्णा तालुक्यातील ४ हजार ९९९ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी १४ लाख २५ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. प्रशासनाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या संपूर्ण अनुदानाचे वितरण झाले असून आता दुसºया टप्प्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.साडे तीन लाख शेतकºयांना मिळणार लाभपरभणी जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांचा सर्व्हे जिल्हा प्रशासनाने केला होता. या सर्व्हेनंतर शेतकºयांना द्यावयाच्या रक्कमेची मागणी शासनाकडे करण्यात आली. जिल्ह्यात ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचे बोंडअळीमुळे नुकसान झाले असून त्यासाठी १५७ कोटी ९७ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या संपूर्ण मागणीला मंजुरी मिळाली आहे. तीन टप्प्यामध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार असून पहिल्या टप्प्यात ८६ हजार ५१५ शेतकºयांच्या खात्यावर ४१ कोटी ९६ लाख रुपये जमा झाले आहेत.पेरणीपूर्वी मदत वाटप करासंपूर्ण जिल्हाभरात पेरणीचा हंगाम आता सुरु होत आहे. यासाठी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. बोंडअळीचे अनुदान वेळेत मिळाले तर पेरणी सुकर होणार असल्याने पेरणीपूर्वी अनुदान मिळावे, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. येत्या ८ दिवसांत मोठा पाऊस झाला तर प्रत्यक्ष पेरण्या सुरु होऊ शकतात. त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अनुदान वाटपाची तयारी करावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरी