शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

परभणी : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आले तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:50 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत सदरील विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्याच्या कारणावरुन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. असे असले तरी येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे मात्र वेगळेच आहे. कृषी महाविद्यालयातील काही प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी सातत्याने तणावात आहेत. विशेषत: वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. महाविद्यालयात शैक्षिणक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात नाहीत. या संदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या बोलावून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली जाते. विद्यापीठ परिसरातील सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. बाहेरील व्यक्ती या परिसरात फोटोग्राफी करतात, त्यांच्यासोबत अवैध हत्यारे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण होते. तसेच या बाहेरील व्यक्ती महाविद्यालय परिसरात जोराने वाहने चालवितात, स्टंटबाजी करतात, वाहने चालविण्याचे प्रशिक्षणही महाविद्यालयाच्या मैदानावरच सुरु असते. याबाबत विचारणा केल्यास विद्यार्थ्यांनाच दमदाटी केली जाते. यातून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खेळाच्या मैदानाचा गैरवापर केला जात असतानाही येथील वरिष्ठ केवळ बघ्याची भूमिका घेतात, अशाही विद्यार्थ्याच्या तक्रारी आहेत. बाहेरील व्यक्तींचा वावर येथे अधिक असल्याने विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनाही घडत आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर विद्यार्थिनींनाच गप्प बसण्यास सांगितले जाते. अशाही तक्रारी आहेत.प्राचार्यांची तकलादू भूमिका४कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्यालयी राहत नाहीत. ते बाहेरगावाहून ये-जा करतात. त्यांच्याकडे विद्यार्थी तक्रारी करण्यासाठी गेल्यास त्याची दखल घेतली जात नाही. समूहाने विद्यार्थी गेल्यानंतर एका-एका विद्यार्थ्याला तक्रार करण्यास येण्यास सांगितले जाते. त्यानंतर एक-एक विद्यार्थी तक्रार करण्यास गेल्यास त्याला वैयक्तिकरित्या टार्गेट केले जाते, त्याची शैक्षणिक कामगिरी काय आहे ? त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क अदा करायचे असल्यास त्यासाठी तगादा लावणे आदी प्रकार केले जातात. तसेच प्रात्याक्षिक परीक्षेत गुण कमी देण्याची धमकी दिली जाते, अशाही विद्यार्थ्याच्या तक्रारी आहेत. प्राचार्यांच्या तकलादू भूमिकेचा विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याचेही या संदर्भात राज्य शासनाकडे तक्रार नमूद करण्यात आली आहे.निकाल वेळेवर लागेनात४कृषी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील सत्राचे नियोजन करता येत नाही. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरु असताना विद्यापीठ प्रशासन मात्र या संदर्भात गांभीर्याने दखल घेत नाही, अशाही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीStudentविद्यार्थीexamपरीक्षा