शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

परभणी : रस्ता कामांतील पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:42 IST

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाºया निधीतून लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत उपलब्ध होणाºया निधीतून करण्यात येणाºया ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा कामांच्या मंजुरीतील जि़प़ पदाधिकाºयांचा हस्तक्षेप संपुष्टात आला असून आता या निधीतून तीन यंत्रणांमार्फत काम करता येणार आहे़ शिवाय या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाºया निधीतून लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत उपलब्ध होणाºया निधीतून करण्यात येणाºया ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा कामांच्या मंजुरीतील जि़प़ पदाधिकाºयांचा हस्तक्षेप संपुष्टात आला असून आता या निधीतून तीन यंत्रणांमार्फत काम करता येणार आहे़ शिवाय या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही़जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला रस्ते क्षेत्रासाठी लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत उपलब्ध होणाºया निधीतून ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असतो़ या निधीतून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे केली जातात़ बहुतांश वेळा या कामांची निवड ही पदाधिकाºयांमार्फतच होत असते़ यात जि़प़ अध्यक्ष, बांधकाम समितीचे सभापती यांची महत्त्वाची भूमिका असते़आपल्या मतदार संघातील गावांना झुकते माप देत मर्जीतील कार्यकर्त्यांच्या गावांमध्येही आतापर्यंत रस्त्यांची कामे पदाधिकाºयांकडून केली जात होती़ आता शासनाने या संदर्भात ६ आॅक्टोबर रोजी आदेश काढला असून, त्यामध्ये पदाधिकाºयांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध घालण्यात आला आहे़या योजनेंतर्गत कामांना मंजुरी देऊन सदर कामांच्या अनुषंगाने कार्यान्वित यंत्रणा निवडण्याकरिता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे़ त्यामध्ये जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सहसचिव असून, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेला एक आमदारही समितीचा सदस्य राहणार आहे़ ही समिती कामांची व यंत्रणांची निवड करणार आहे़निवड करताना चालू असलेल्या व नियोजित असलेल्या कामाबाबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्यातील रस्त्यांचा समन्वय साधावा लागणार आहे़ शिवाय महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग या पैकी एका यंत्रणेची निवड करण्याचा अधिकार या समितीला राहणार आहे़ तसेच समितीने संबंधित यंत्रणेची निवड केल्यास या यंत्रणेस जिल्हा परिषदेच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही़ शिवाय ज्या यंत्रणेकडे कामे सोपविण्याचा निर्णय होईल, त्या यंत्रणेला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची राहणार आहे़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांचे या योजनेच्या कामांवरील नियंत्रण सैल झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीroad transportरस्ते वाहतूक