शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सेलू शहरात उभ्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:51 IST

जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़सेलू तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याबरोबरच मागील काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना सेलूकरांना करावा लागत आहे़ उन्हाचा पारा ४०-४२ करीत ४५ अंशावर पोहचल्याने नागरिक त्रस्त आहेत़ दिवसा घराबाहेर पडणेही अवघड होईल, असे ऊन सेलूकरांना त्रस्त करून सोडत आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाचा त्रास वाढला आहे़ शेतांमध्ये पिके शिल्लक नसली तरी रबी हंगामातील ज्वारी व इतर पिके काढून ठेवली आहेत़ त्यामुळे शेतशिवार ओसाड पडले आहे़ शेतांमध्येच ठिक ठिकाणी ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवल्या असून, दिवसभराच्या उष्णतेने या पेंढ्या पेट घेत आहेत़ त्यामुळे तालुक्यात कडब्याला आग लागण्याच्या घटनांही वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ शुक्रवारी शहरात एका कारने पेट घेतल्याची घटना घडली़ अचानक कार पेटल्याने परिसरातील नागरिकांना काय झाले ते समजलेच नाही; परंतु, शनिवारी दिवसभर ऊन वाढले होते़ रात्रीही उष्णता अधिक प्रमाणात होती़ त्यातूनच कारने पेट घेतल्याची घटना घडली़उभी कार जळून खाकसेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एमएच ११ सीजी-७४४३ या क्रमांकाच्या कारला शुक्रवारी रात्री ८़३० च्या सुमारास अचानक आग लागली़ सातारा येथील परशूराम दावडकर व बाळासाहेब सावंत हे दोघे मोबाईल टॉवरची दुरुस्ती करण्यासाठी परभणीहून आले होते़ दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतल्याचे लक्षात आले़ नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत अग्नीशमन दलास पाचारण केले़ मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली़ सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही़ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीcarकारfireआग