शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी : सेलू शहरात उभ्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:51 IST

जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़सेलू तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याबरोबरच मागील काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना सेलूकरांना करावा लागत आहे़ उन्हाचा पारा ४०-४२ करीत ४५ अंशावर पोहचल्याने नागरिक त्रस्त आहेत़ दिवसा घराबाहेर पडणेही अवघड होईल, असे ऊन सेलूकरांना त्रस्त करून सोडत आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाचा त्रास वाढला आहे़ शेतांमध्ये पिके शिल्लक नसली तरी रबी हंगामातील ज्वारी व इतर पिके काढून ठेवली आहेत़ त्यामुळे शेतशिवार ओसाड पडले आहे़ शेतांमध्येच ठिक ठिकाणी ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवल्या असून, दिवसभराच्या उष्णतेने या पेंढ्या पेट घेत आहेत़ त्यामुळे तालुक्यात कडब्याला आग लागण्याच्या घटनांही वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ शुक्रवारी शहरात एका कारने पेट घेतल्याची घटना घडली़ अचानक कार पेटल्याने परिसरातील नागरिकांना काय झाले ते समजलेच नाही; परंतु, शनिवारी दिवसभर ऊन वाढले होते़ रात्रीही उष्णता अधिक प्रमाणात होती़ त्यातूनच कारने पेट घेतल्याची घटना घडली़उभी कार जळून खाकसेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एमएच ११ सीजी-७४४३ या क्रमांकाच्या कारला शुक्रवारी रात्री ८़३० च्या सुमारास अचानक आग लागली़ सातारा येथील परशूराम दावडकर व बाळासाहेब सावंत हे दोघे मोबाईल टॉवरची दुरुस्ती करण्यासाठी परभणीहून आले होते़ दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतल्याचे लक्षात आले़ नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत अग्नीशमन दलास पाचारण केले़ मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली़ सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही़ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीcarकारfireआग