शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

परभणी : सेलू शहरात उभ्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:51 IST

जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़सेलू तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याबरोबरच मागील काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना सेलूकरांना करावा लागत आहे़ उन्हाचा पारा ४०-४२ करीत ४५ अंशावर पोहचल्याने नागरिक त्रस्त आहेत़ दिवसा घराबाहेर पडणेही अवघड होईल, असे ऊन सेलूकरांना त्रस्त करून सोडत आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाचा त्रास वाढला आहे़ शेतांमध्ये पिके शिल्लक नसली तरी रबी हंगामातील ज्वारी व इतर पिके काढून ठेवली आहेत़ त्यामुळे शेतशिवार ओसाड पडले आहे़ शेतांमध्येच ठिक ठिकाणी ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवल्या असून, दिवसभराच्या उष्णतेने या पेंढ्या पेट घेत आहेत़ त्यामुळे तालुक्यात कडब्याला आग लागण्याच्या घटनांही वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ शुक्रवारी शहरात एका कारने पेट घेतल्याची घटना घडली़ अचानक कार पेटल्याने परिसरातील नागरिकांना काय झाले ते समजलेच नाही; परंतु, शनिवारी दिवसभर ऊन वाढले होते़ रात्रीही उष्णता अधिक प्रमाणात होती़ त्यातूनच कारने पेट घेतल्याची घटना घडली़उभी कार जळून खाकसेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एमएच ११ सीजी-७४४३ या क्रमांकाच्या कारला शुक्रवारी रात्री ८़३० च्या सुमारास अचानक आग लागली़ सातारा येथील परशूराम दावडकर व बाळासाहेब सावंत हे दोघे मोबाईल टॉवरची दुरुस्ती करण्यासाठी परभणीहून आले होते़ दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतल्याचे लक्षात आले़ नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत अग्नीशमन दलास पाचारण केले़ मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली़ सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही़ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीcarकारfireआग