शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

परभणी : जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:22 IST

शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या उपांगांच्या कामांना गती देण्यात आली असून, धर्मापुरी येथे उभारल्या जाणाºया जलशुद्धीकरण केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित कामेही सुरू असून, मे महिन्यापर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवले आहे़ ही योजना मे महिन्यात कार्यान्वित झाल्यास परभणी शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या उपांगांच्या कामांना गती देण्यात आली असून, धर्मापुरी येथे उभारल्या जाणाºया जलशुद्धीकरण केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित कामेही सुरू असून, मे महिन्यापर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवले आहे़ ही योजना मे महिन्यात कार्यान्वित झाल्यास परभणी शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो़केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त योजनेतून परभणी शहरासाठी युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजना २००८ मध्ये मंजूर झाली होती़ मात्र या योजनेचे काम संथगतीने झाले़ योजनेचे दोन टप्पे करण्यात आले़ आता या दोन्ही टप्प्यांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे अमृत योजनेंतर्गत केली जात आहेत़ त्यासाठी महापालिकेला १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील जलवाहिनी, जलकुंभ अशी कामे हाती घेण्यात आली आहेत़ परभणी-जिंतूर रस्त्यावर धर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे़ या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, या केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ या ठिकाणी सध्या २ क्लॅरीफोकूलेटर उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे़ येलदरी येथून निघालेले पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर त्यातील गाळ वेगळा करणे, क्लोरीनेशन करणे आणि शुद्धीकरण करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यात जलशुद्धीकरण प्रक्रिया होते़ ही कामे आता गतीने केली जात आहेत़ याच ठिकाणी एक संप वेल उभारण्यात येणार असून, त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे़शुद्धीकरण प्रकल्पातून बाहेर पडलेले पाणी या संपवेलमध्ये साठविले जाते़ हे काम हाती घेण्यात आले असून, संपवेल पासून ते परभणी शहरातील खाजा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या एमबीआरपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी मार्कआऊटच्या कामालाही बुधवारी सुरुवात करण्यात आली आहे़ तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पस्थळी रॅपिड सँड फिल्ट्रेशन ही शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारी यंत्रणाही उभारणीचे काम सुरू आहे़सध्या या यंत्रणेअंतर्गत व्हॉल्व्ह बसविले जात आहेत़ जलशुद्धीकरण प्रकल्पापासून निघालेले पाणी खाजा कॉलनी येथील एमबीआरपर्यंत पोहचते करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या कामालाही सुरुवात होत असून, मे महिन्यापर्यंत संपूर्ण योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ अमृत योजनेंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षातील डिसेंबर महिन्यापर्यंतची मुदत आहे़ मात्र सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता मे महिन्यातच ही योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत़योजना झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचतपरभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जात आहे़ एक वर्षासाठी परभणी शहराला ८ दलघमी पाणी लागते़ यावर्षी सर्वच प्रकल्पांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने शहरासाठी सिद्धेश्वर आणि निम्न दूधना प्रकल्पात पाणी आरक्षित करण्यात आले आहे़परभणी शहरासाठी हे पाणी नदीपात्रातून बंधाºयात येते़ त्यामुळे ८ दलघमीसाठी तब्बल ३० दलघमी पाणी दोन्ही प्रकल्पांमध्ये आरक्षित करावे लागले आहे़ पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले तर थेट येलदरी येथून जलवाहिनीच्या सहाय्याने ८ दलघमी पाणी शहरात पोहचू शकते़त्यामुळे उर्वरित २२ दलघमी पाण्याची बचत दरवर्षी होवू शकते़ महापालिकेच्या नियोजनाप्रमाणे मे महिन्यात ही योजना कार्यान्वित झाली तर शहराला लागणारे ८ दलघमी पाणीच प्रकल्पांमधून उचलले जाईल़ परिणामी उर्वरित पाणी इतर योजनांसाठी वापरणे सोयीचे होणार आहे़४गुरुत्वाकर्षणाने येणार पाणीयुआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत दोन टप्प्यांमध्ये कामे करण्यात आली आहेत़ ही कामे जवळपास पूर्ण झाली असून, त्यात पहिल्या टप्प्यामध्ये येलदरी येथे उद्भव विहीर उभारण्यात आली आहे़ येलदरीपासून काही अंतरावर रायझिंग मेन आणि त्यापासून काही अंतरावर १ कोटी २५ लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचा ब्रॅकेट पॉर्इंट टर्मिनेटर (बीपीटी) उभारण्यात आला आहे़ हे तिन्ही कामे टप्पा १ मधील असून, टप्पा २ मध्ये बीपीटीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी अंथरण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ विशेष म्हणजे बीपीटीपासून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने पाणी धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहचणार आहे़ पुढील आठवड्यात त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे़ पाणीपुरवठा योजनेसाठी येलदरी येथे वीज वितरण कंपनीच्या केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून, जोडणीचे कामही येत्या काही दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली़७० किमीची जलवाहिनी पूर्ण४अमृत योजनेंतर्गत परभणी शहरामध्ये १७३ किमी अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यात आतापर्यंत ७० किमी अंतराची जलवाहिनी टाकली असून, उर्वरित कामेही टप्प्या टप्प्याने केली जात आहेत़ शहराच्या वेगवेगळ्या भागात सहा जलकुंभ उभारण्यात आले असून, या जलकुंभाचे कामही स्लॅबलेव्हलपर्यंत पोहचले आहे़ अंतर्गत जलवाहिनी आणि जलकुंभाची कामेही सध्या सुरू करण्यात आली आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका