शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परभणी : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला ३३४१ रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:53 IST

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकºयांना नैसर्गीक संकटांचा सामना करावा लागत आहे़ खरीप व रबी हंगामात पेरणी केलेल्या पिकातून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत़ दरवर्षी खरीप व रबी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकांची दारे ठोठवावी लागत आहेत़ उसणवारीवर पैसे उपलब्ध करून खरीप व रबी हंगामातील पेरणी केली जाते़ त्यातून उत्पादित झालेला शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला अपेक्षित भाव दिला जात नाही़ त्यामुळे शेतकºयांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडते, हा आजपर्यंतचा अनुभव आहे़यावर्षी जून व जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला़ या पावसाने आॅगस्ट महिन्यात सोयाबीन, कापूस ही खरीप हंगामातील पिके चांगली बहरली़ परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या तीन महिन्यांत पाऊसच झाला नाही़ त्यामुळे सोयाबीन व कापूस पिके जागेवरच करपून गेली़ ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी साठा आहे़ त्या शेतकºयांनी सोयाबीन जोपासले़ बोरी व परिसरातील शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बोरी बाजार समितीच्या मार्केट यार्डात आणावा, यासाठी बाजार समितीने १५ आॅक्टोबरपासून जाहीर लिलावाद्वारे सोयाबीन खरेदी सुरू केली़राज्य व केंद्र शासनाने जाहीर केलेला ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती़ परंतु, व्यापाºयांकडून हमीभावाला फाटा देत अडीच ते तीन हजार रुपयांप्रमाणे शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी केली़; परंतु, १६ नोव्हेंबर रोजी बोरी येथील बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या सोयाबीनला ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़३० हजार क्विंटल सोयाबीन खरेदीजिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बोरी बाजार समितीकडे पाहिले जाते़ १५ आॅक्टोबरपासून या बाजार समितीत जाहीर लिलावाद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली़ दिवाळी सणाला शेतकºयांना पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी जास्तीत जास्त व्यापाºयांकडून शेतकºयांचा शेतमाल खरेदीस सुरुवात झाली़ १६ नोव्हेंबरपर्यंत या बाजार समितीत बोरी व परिसरातील शेतकºयांकडून ३० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे, जिंतूर येथे राज्य शासनाने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यासाठीची प्रक्रिया सुरू असली तरी बोरी बाजार समितीत हमीभावाबरोबर भाव मिळत असल्याने शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीकडे पाठ फिरवून खाजगी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्री करण्यासाठी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे़बाजार समितीतील व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न बाजार समितीकडून करण्यात येत आहे़ सोयाबीन बरोबरच कापसालाही सर्वोच्च भाव देण्याचा विचार व्यापारी व बाजार समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे़ त्यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणावा़-चंद्रकांत चौधरी,मुख्य प्रशासक बाजार समिती, बोरी

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी