शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : घनकचरा व्यवस्थापनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:00 IST

परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

१८ कोटी ८३ लाखांचा निधीलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.औरंगाबाद येथील कचऱ्याची समस्या राज्यभर गाजल्यानंतर महानगरपालिकांच्या शहरांमध्ये कचºयाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने महानगरपालिकांकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी आराखडा मागविला होता. दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, राज्य शासनाने या आराखड्यानुसार १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी महापालिकेला प्रदान केला आहे. या निधीत १४ व्या वित्त आयोगातून परभणी महानगरपालिकेने ७ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर उर्वरित राज्य शासनाचा ४० टक्के आणि केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे.नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परभणी शहरासाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच या निधीमधून कामे केली जाणार आहेत. एकूण २९ बाबींवर ही कामे होणार आहेत. त्यात बायोमायनिंग प्रकल्प उभारणे, ३ कॉम्पॅक्टर, २ टिप्पर खरेदी करणे तसेच लोकांमध्ये जनजागृती, कर्मचाºयांचे प्रशिक्षण आदी बाबींवर या निधीमधून खर्च होणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.आचारसंहितेनंतर होणार कामेराज्य शासनाच्या नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी देत निधीही उपलब्ध करुन दिला आहे. सध्या परभणी जिल्ह्यात विधानपरिषदेची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाची प्रक्रिया सुरु होणार आहे. या प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या अंतर्गत करण्यात येणाºया कामांसाठी निविदा मागविल्या जाणार असून निविदा प्रक्रिया राबवून कामे केली जाणार आहेत.अधिकाºयांवर दिली प्रकल्पाची जबाबदारीमहापालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी मनपातील अधिकाºयांकडे विविध जबाबदाºयाही देण्यात आल्या आहेत. त्यात यांत्रिकी विभागप्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्याकडे तांत्रिक स्वरुपाची जबाबदारी आहे. कनिष्ठ अभियंता शेख आर्शद यांच्याकडे बांधकामाच्या अनुषंगाने तर प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्यावर स्वच्छतेच्या संदर्भात जबाबदारी देण्यात आली आहे.कचºयाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्नपरभणी शहरात सध्या जमा होणारा कचरा धाररोड येथील डपिंग ग्राऊंडवर साठविला जातो. स्वच्छता अभियानांतर्गत या कचºयाचे नैसर्गिकरित्या प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही शहरात कार्यान्वित आहे. धाररोड परिसरातील डपिंग ग्राऊंड येथे जमा होणाºया कचºयापासून रासायनिक व गांडुळ खताची निर्मितीही केली जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साठलेला जुना कचरा रासायनिक पदार्थांच्या वापराने नष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सध्या कचºयाचा प्रश्न नसला तरी आगामी ५० वर्षात कचºयाची समस्या निर्माण होऊ नये, यादृष्टीने राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प शहरासाठी मंजूर केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका