शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

परभणी : रबीतही संथ गतीने कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:45 IST

यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पीक कर्ज वाटपालाही घरघर लागली आहे. खरीप हंगामामधील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसताना रबी हंगामातही आतापर्यंत केवळ ६.५३ टक्के कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गोची होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पीक कर्ज वाटपालाही घरघर लागली आहे. खरीप हंगामामधील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसताना रबी हंगामातही आतापर्यंत केवळ ६.५३ टक्के कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गोची होत आहे.परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी खरीप आणि रबी पिकांच्या पेरण्यांसाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले जाते. हे उद्दिष्ट पूर्ण करणे बँकांसाठी बंधनकारक आहे. दरवर्षी बँकांकडून उद्दिष्टांची पूर्तीही होते. मात्र यावर्षी खरिपापाठोपाठ रबी हंगामातील उद्दिष्टालाही घरघर लागली आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये जिल्ह्यासाठी १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचे उद्दिष्ट बँकांना दिले होते. खरीप हंगाम संपून गेला तरी हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. आता बँकांना रबी हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. परभणी जिल्ह्यात रबी हंगामासाठी ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपये, व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे.आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात रबीचा हंगाम सुरु होतो. या हंगामात शेतकºयांना पेरणी करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने पीक कर्जाचे वाटप केले जाते. रबी हंगामासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत २६ नोव्हेंबरपर्यंत २० कोेटी ४७ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. या कर्ज वाटपाची टक्केवारी ६.५३ टक्के एवढी आहे. ग्रामीण बँकेने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत १६ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.व्यापारी बँकांनी केवळ ३ कोटी ७७ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ५० लाख २३ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.जिल्ह्यातील २ हजार ६३१ शेतकºयांनाच या कर्जाचा लाभ झाला आहे. रबीचा हंगामही ओसरत असून बँकांकडून रबी हंगामातील कर्ज वाटपाचे उद्दिष्टही पूर्ण न होण्याची शक्यताच अधिक आहे.खरीपात ३० टक्के वाटप४यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही बँकांकडून पीक कर्ज वाटपाला धिमा प्रतिसाद मिळाला. या हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. बँकांनी ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३० टक्के कर्ज वाटप झाले असून खरीपाचा हंगाम संपल्याने आता बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपाला सुरुवात केली आहे; परंतु, या हंगामातही कर्ज वाटपाची गती कमी असल्याचे दिसत आहे.ग्रामीण बँकेचे सर्वाधिक कर्ज वाटप४खरीप हंगामाबरोबरच रब्बीच्या हंगामातही ग्रामीण बँकेने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. बँकेने २ हजार १३५ शेतकºयांना १६ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी ५०.९१ टक्के एवढी आहे. व्यापारी बँकांनी केवळ १.८२ टक्के उद्दिष्ट गाठले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेने ०.६७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.पेरण्या रखडल्याचा परिणाम४परतीच्या पावसावर जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरण्या केल्या जातात. मात्र यावर्षी या हंगामात पेरण्याच झाल्या नाहीत. केवळ १३ टक्के पेरण्या झाल्या असून उर्वरित शेतकºयांनी रबीच्या पीक कर्जाकडेही पाठ फिरवली आहे. पेरण्याच नसल्याने पीक कर्ज वाटपही होत नसल्याची स्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रबी हंगामच होणार नसल्याने शेतकºयांना उत्पन्नावर पाणी फेरावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी