शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:46 IST

नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.परभणी शहरामध्ये नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यासाठी वैयक्तिक शौचालयांना अनुदान देण्यात आले. शहरातील हगणदारीची स्थळे निष्काशित करुन लाखो रुपये खर्च करुन सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे, शौचालयांची देखभाल करण्यासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गोरगरीब नागरिकांची पाणंदमुक्ती झाली. शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषितही करण्यात आले. परंतु, शहराची हगणदारीमुक्ती अल्पकाळाचीच ठरली आहे. विहीर, बोअरची पाणीपातळी घटली आणि गोरगरीबांच्या हाती पुन्हा एकदा लोटा आल्याचे दिसू लागले आहे.शहरात ६३ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. यापैकी काही शौचालयांची पाहणी शनिवारी करण्यात आली. त्यात ८ शौचालये पाण्याअभावी बंद असल्याचे दिसून आले. शहरातील लोहगाव रोडवरील साखला प्लॉट भागातील सार्वजनिक शौचालयास भेट दिली तेव्हा या ठिकाणी पाणी नसल्याने सांगण्यात आले. हे शौचालय बंद नसले तरी नागरिकांना पाण्याची अडचण सहन करावी लागत आहे. घरुन पाणी न्यावे लागत असल्याचे दिसून आले. बागवान मोहल्ला भागातील सार्वजनिक शौचालय १५ दिवसांपासून बंद आहे. या शौचालयात पाण्याची व्यवस्था आहे. परंतु, फरशीचे काम सुरु असल्याचे कारण देत शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. गंगाखेड रस्त्यावरील कुकुटपालन परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाला भेट दिली तेव्हा दोन महिन्यांपासून हे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचे सांगण्यात आले. शौचालय परिसरात घेतलेल्या बोअरची मोटार जळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी नसल्याने शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. मोटार जळाल्या संदर्भात महापालिकेला कळविण्यात आले. त्यानंतर काही दिवस टँकरचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. आता हे पाणीही बंद झाल्याने शौचालयाला कुलूप ठोकावे लागले आहे.गंगाखेडरोडवरच विकासनगर भागातील सार्वजनिक शौचालयांचीही अशीच अवस्था झाली आहे. या सार्वजनिक शौचालय परिसरातील लाईटचा बोर्ड जळाला आहे. त्यामुळे बोअरला पाणी असूनही त्याचा वापर करता येत नाही. परिणामी शौचालय बंद ठेवावे लागत आहे. १५ दिवसांपासून विकास नगरातील शौचालयही बंद आहे. रमाबाई आंबेडकरनगर, आयटीआय-१ येथील सार्वजनिक शौचालय परिसरातील बोअर आटल्याने हे शौचालयही बंद आहेत. अशीच परिस्थिती काद्राबाद प्लॉट, जिल्हा परिषद समोरील शौचालय, अजिजियानगर, पंचवटीनगर येथील शौचालयांची झाली आहे. पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांनाही पाणी टंचाईचा फटका बसला असून ही शौचालये बंद ठेवावी लागत आहेत.उद्घाटनापासून शौचालय बंदचयेथील काद्राबाद प्लॉट परिसरात जिंतूर रस्त्यावर उभारलेले सार्वजनिक शौचालय उद्घाटनापासून बंद असल्याची बाब नागरिकांनी बोलून दाखविली. सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनानंतर चार-पाच दिवस हे शौचालय सुरु होते. त्यानंतर मात्र आजपर्यंत या शौचालयाचे कुलूप उघडले गेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या या शौचालयाचा अजूनही नागरिकांना वापर करता आला नाही. जिल्हा परिषदेच्या समोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली होती. मात्र हे शौचालयही काही काळच सुरु राहिले. त्यानंतर शौचालय बंद पडले आहे. या ठिकाणी पुरेसी पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालय बंद असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.आता कुठे मीटरचे कामकाद्राबाद प्लॉट भागात जिंतूर रस्त्यावरील शौचालयाची पाहणी करण्यासाठी जात असतानाच या शौचालयाला अधिकृत वीज पुरवठा घेण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले. मागील अनेक दिवसांपासून हे शौचालय केवळ वीज पुरवठा नसल्याने बंद होते. शनिवारी या ठिकाणी वीज पुरवठा घेण्यासाठी मीटर बसविले जात असल्याचे दिसून आले. मीटरची जोडणी झाल्यानंतर तरी शौचालयाचा वापर सुरु होतो की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.घराचे कामही ठप्पसार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी २४ तास वास्तव्य करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना १ खोली बांधून देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी हे काम झाले आहे. परंतु, गंगाखेडरोडवरील कुकुटपालन परिसरात खोलीचे बांधकामही झाले नाही. त्यामुळे येथील कर्मचाºयांना ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी शौचालयाच्या आवारातच सहारा घ्यावा लागत आहे. रखडलेले खोलीचे बांधकाम त्वरित पूर्ण केले तर कर्मचाºयांची गैरसोय दूर होऊ शकते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीelectricityवीज