शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:46 IST

नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.परभणी शहरामध्ये नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यासाठी वैयक्तिक शौचालयांना अनुदान देण्यात आले. शहरातील हगणदारीची स्थळे निष्काशित करुन लाखो रुपये खर्च करुन सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे, शौचालयांची देखभाल करण्यासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गोरगरीब नागरिकांची पाणंदमुक्ती झाली. शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषितही करण्यात आले. परंतु, शहराची हगणदारीमुक्ती अल्पकाळाचीच ठरली आहे. विहीर, बोअरची पाणीपातळी घटली आणि गोरगरीबांच्या हाती पुन्हा एकदा लोटा आल्याचे दिसू लागले आहे.शहरात ६३ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. यापैकी काही शौचालयांची पाहणी शनिवारी करण्यात आली. त्यात ८ शौचालये पाण्याअभावी बंद असल्याचे दिसून आले. शहरातील लोहगाव रोडवरील साखला प्लॉट भागातील सार्वजनिक शौचालयास भेट दिली तेव्हा या ठिकाणी पाणी नसल्याने सांगण्यात आले. हे शौचालय बंद नसले तरी नागरिकांना पाण्याची अडचण सहन करावी लागत आहे. घरुन पाणी न्यावे लागत असल्याचे दिसून आले. बागवान मोहल्ला भागातील सार्वजनिक शौचालय १५ दिवसांपासून बंद आहे. या शौचालयात पाण्याची व्यवस्था आहे. परंतु, फरशीचे काम सुरु असल्याचे कारण देत शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. गंगाखेड रस्त्यावरील कुकुटपालन परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाला भेट दिली तेव्हा दोन महिन्यांपासून हे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचे सांगण्यात आले. शौचालय परिसरात घेतलेल्या बोअरची मोटार जळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी नसल्याने शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. मोटार जळाल्या संदर्भात महापालिकेला कळविण्यात आले. त्यानंतर काही दिवस टँकरचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. आता हे पाणीही बंद झाल्याने शौचालयाला कुलूप ठोकावे लागले आहे.गंगाखेडरोडवरच विकासनगर भागातील सार्वजनिक शौचालयांचीही अशीच अवस्था झाली आहे. या सार्वजनिक शौचालय परिसरातील लाईटचा बोर्ड जळाला आहे. त्यामुळे बोअरला पाणी असूनही त्याचा वापर करता येत नाही. परिणामी शौचालय बंद ठेवावे लागत आहे. १५ दिवसांपासून विकास नगरातील शौचालयही बंद आहे. रमाबाई आंबेडकरनगर, आयटीआय-१ येथील सार्वजनिक शौचालय परिसरातील बोअर आटल्याने हे शौचालयही बंद आहेत. अशीच परिस्थिती काद्राबाद प्लॉट, जिल्हा परिषद समोरील शौचालय, अजिजियानगर, पंचवटीनगर येथील शौचालयांची झाली आहे. पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांनाही पाणी टंचाईचा फटका बसला असून ही शौचालये बंद ठेवावी लागत आहेत.उद्घाटनापासून शौचालय बंदचयेथील काद्राबाद प्लॉट परिसरात जिंतूर रस्त्यावर उभारलेले सार्वजनिक शौचालय उद्घाटनापासून बंद असल्याची बाब नागरिकांनी बोलून दाखविली. सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनानंतर चार-पाच दिवस हे शौचालय सुरु होते. त्यानंतर मात्र आजपर्यंत या शौचालयाचे कुलूप उघडले गेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या या शौचालयाचा अजूनही नागरिकांना वापर करता आला नाही. जिल्हा परिषदेच्या समोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली होती. मात्र हे शौचालयही काही काळच सुरु राहिले. त्यानंतर शौचालय बंद पडले आहे. या ठिकाणी पुरेसी पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालय बंद असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.आता कुठे मीटरचे कामकाद्राबाद प्लॉट भागात जिंतूर रस्त्यावरील शौचालयाची पाहणी करण्यासाठी जात असतानाच या शौचालयाला अधिकृत वीज पुरवठा घेण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले. मागील अनेक दिवसांपासून हे शौचालय केवळ वीज पुरवठा नसल्याने बंद होते. शनिवारी या ठिकाणी वीज पुरवठा घेण्यासाठी मीटर बसविले जात असल्याचे दिसून आले. मीटरची जोडणी झाल्यानंतर तरी शौचालयाचा वापर सुरु होतो की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.घराचे कामही ठप्पसार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी २४ तास वास्तव्य करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना १ खोली बांधून देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी हे काम झाले आहे. परंतु, गंगाखेडरोडवरील कुकुटपालन परिसरात खोलीचे बांधकामही झाले नाही. त्यामुळे येथील कर्मचाºयांना ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी शौचालयाच्या आवारातच सहारा घ्यावा लागत आहे. रखडलेले खोलीचे बांधकाम त्वरित पूर्ण केले तर कर्मचाºयांची गैरसोय दूर होऊ शकते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीelectricityवीज