शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

परभणीतील स्थिती: सोयाबीनचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:36 IST

शेतकºयांकडे खरीप हंगामातील सोयाबीन आल्यानंतर दरांमध्ये घसरण झाल्याने त्यांची एकीकडे आर्थिक कोंडी झालेली असताना दुसरीकडे शेतकºयांचे सोयाबीन संपल्यानंतर तब्बल १२०० रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे कमीदरात सोयाबीन विकलेल्या शेतकºयांना हुरहुर लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांकडे खरीप हंगामातील सोयाबीन आल्यानंतर दरांमध्ये घसरण झाल्याने त्यांची एकीकडे आर्थिक कोंडी झालेली असताना दुसरीकडे शेतकºयांचे सोयाबीन संपल्यानंतर तब्बल १२०० रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे कमीदरात सोयाबीन विकलेल्या शेतकºयांना हुरहुर लागली आहे.परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात किरकोळ खरेदीदारांकडून शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केले गेले. शेतमालाची कमी दराने खरेदी होत असल्याच्या तक्रारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकºयांनी केल्या. त्यानंतर बाजार समितीने जाहीर लिलावाद्वारे सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश दिले. मात्र तेथेही शेतकरी व व्यापाºयांचे दररोजच खटके उडू लागले. त्यामुळे बाजार समितीने आडतीत लिलाव पद्धतीने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आडतीतही शेतकºयांना शासनाने ठरवून दिलेला हमीभाव मिळाला नाही. मॉश्चरच्या नावाखाली व्यापाºयांनी केवळ अडीच हजार रुपयांपर्यंतच सोयाबीनची खरेदी केली. त्यामुळे बाजार समितीकडून फडकरी विक्रेते बंद करुन जाहीर लिलाव व आडतीत योग्य तो भाव मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या शेतकºयांना तेथेही फटका बसला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी कायम राहिल्या. सध्या बहुतांश शेतकºयांकडील सोयाबीन विक्री झालेली आहे. आता केवळ व्यापाºयांकडेच मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा आहे. आतापर्यंत प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांपर्यंत स्थीर राहिलेला भाव गेल्या दोन दिवसांपासून ३ हजार ७५१ रुपयापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे शेतकºयांकडील सोयाबीन संपल्यानंतर भाव वधारल्याने सोयाबीन उत्पादकांना हुरहुर लागली आहे.व्यापाºयांना होणार फायदाकृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाºयांनी शेतकºयांचे सोयाबीन २२०० ते २५०० रुपयापर्यंत खरेदी केले आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून तब्बल १२०० रुपयांनी वाढलेल्या भावाचा सोयाबीन उत्पादकांना फायदा होण्याऐवजी व्यापाºयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन गतवर्षीसारखे याहीवर्षी प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.