शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परभणीतील स्थिती: सोयाबीनचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:36 IST

शेतकºयांकडे खरीप हंगामातील सोयाबीन आल्यानंतर दरांमध्ये घसरण झाल्याने त्यांची एकीकडे आर्थिक कोंडी झालेली असताना दुसरीकडे शेतकºयांचे सोयाबीन संपल्यानंतर तब्बल १२०० रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे कमीदरात सोयाबीन विकलेल्या शेतकºयांना हुरहुर लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांकडे खरीप हंगामातील सोयाबीन आल्यानंतर दरांमध्ये घसरण झाल्याने त्यांची एकीकडे आर्थिक कोंडी झालेली असताना दुसरीकडे शेतकºयांचे सोयाबीन संपल्यानंतर तब्बल १२०० रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे कमीदरात सोयाबीन विकलेल्या शेतकºयांना हुरहुर लागली आहे.परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात किरकोळ खरेदीदारांकडून शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केले गेले. शेतमालाची कमी दराने खरेदी होत असल्याच्या तक्रारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकºयांनी केल्या. त्यानंतर बाजार समितीने जाहीर लिलावाद्वारे सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश दिले. मात्र तेथेही शेतकरी व व्यापाºयांचे दररोजच खटके उडू लागले. त्यामुळे बाजार समितीने आडतीत लिलाव पद्धतीने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आडतीतही शेतकºयांना शासनाने ठरवून दिलेला हमीभाव मिळाला नाही. मॉश्चरच्या नावाखाली व्यापाºयांनी केवळ अडीच हजार रुपयांपर्यंतच सोयाबीनची खरेदी केली. त्यामुळे बाजार समितीकडून फडकरी विक्रेते बंद करुन जाहीर लिलाव व आडतीत योग्य तो भाव मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या शेतकºयांना तेथेही फटका बसला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी कायम राहिल्या. सध्या बहुतांश शेतकºयांकडील सोयाबीन विक्री झालेली आहे. आता केवळ व्यापाºयांकडेच मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा आहे. आतापर्यंत प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांपर्यंत स्थीर राहिलेला भाव गेल्या दोन दिवसांपासून ३ हजार ७५१ रुपयापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे शेतकºयांकडील सोयाबीन संपल्यानंतर भाव वधारल्याने सोयाबीन उत्पादकांना हुरहुर लागली आहे.व्यापाºयांना होणार फायदाकृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाºयांनी शेतकºयांचे सोयाबीन २२०० ते २५०० रुपयापर्यंत खरेदी केले आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून तब्बल १२०० रुपयांनी वाढलेल्या भावाचा सोयाबीन उत्पादकांना फायदा होण्याऐवजी व्यापाºयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन गतवर्षीसारखे याहीवर्षी प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.