शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

परभणी : पाण्यासाठी जमिनीची केली जातेय चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:55 IST

तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.तालुक्यात डिसेंबर महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. चार वर्षापासून सातत्याने दुष्काळीची परिस्थिती असल्याने यावर्षी पाण्याची टंचाई वाढली आहे. मागील वर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून दोन महिन्यांपूर्वी पाणी सोडले होते. या पाण्याने काही काळ तग धरला. आता मात्र पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. बागायती केळी, ऊस ही पिके हातची गेली आहेत. शेतकरी पाण्यासाठी विहिरींचे खोदकाम करीत आहेत. ५० ते ६० फूट विहीर खोदूनही पाणी लागत नाही. तर बोअरवेल ५०० फुटापर्यंत खोदल्यानंतरही कोरडा फुफाटा बाहेर पडत आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी खोलवर खोदूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होत आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात चार महिन्यांमध्ये १०० बोअर खोदण्यात आले. एक बोअर घेण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यातील बोअरवरील खर्चाचा अंदाज लावला तर ४० लाख रुपये केवळ पाणी शोधण्यासाठी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे बोअर खोदकामावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.२ हजारांपेक्षा अधिक: तालुक्यात बोअरवेल४डिसेंबर २०१८ पासूनच तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पाण्यासाठी बोअर खोदकामावर भर दिला आहे. मागील चार महिन्यांमध्ये तालुक्यात सुमारे २ हजार पेक्षा अधिक बोअर घेण्यात आले. विशेष म्हणजे यातील अनेक बोअर ५०० फुटापर्यंत खोदले. खोलवर बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने खोदकामावरील खर्च वाया जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली असून सिंचनासाठीही पाणी नसल्याने बागायती पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.जायकवाडीचे पाणी मिळाल्यास टंचाई होईल शिथिल४पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातून गेला आहे. दोन महिन्यांपूर्वी या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे टंचाई शिथिल झाली होती;परंतु, आता परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.४या प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा कालव्याला सोडले तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. शिवाय कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढून विहिरी, हातपंपांना पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी