शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

परभणी : पाण्यासाठी जमिनीची केली जातेय चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:55 IST

तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.तालुक्यात डिसेंबर महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. चार वर्षापासून सातत्याने दुष्काळीची परिस्थिती असल्याने यावर्षी पाण्याची टंचाई वाढली आहे. मागील वर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून दोन महिन्यांपूर्वी पाणी सोडले होते. या पाण्याने काही काळ तग धरला. आता मात्र पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. बागायती केळी, ऊस ही पिके हातची गेली आहेत. शेतकरी पाण्यासाठी विहिरींचे खोदकाम करीत आहेत. ५० ते ६० फूट विहीर खोदूनही पाणी लागत नाही. तर बोअरवेल ५०० फुटापर्यंत खोदल्यानंतरही कोरडा फुफाटा बाहेर पडत आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी खोलवर खोदूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होत आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात चार महिन्यांमध्ये १०० बोअर खोदण्यात आले. एक बोअर घेण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यातील बोअरवरील खर्चाचा अंदाज लावला तर ४० लाख रुपये केवळ पाणी शोधण्यासाठी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे बोअर खोदकामावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.२ हजारांपेक्षा अधिक: तालुक्यात बोअरवेल४डिसेंबर २०१८ पासूनच तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पाण्यासाठी बोअर खोदकामावर भर दिला आहे. मागील चार महिन्यांमध्ये तालुक्यात सुमारे २ हजार पेक्षा अधिक बोअर घेण्यात आले. विशेष म्हणजे यातील अनेक बोअर ५०० फुटापर्यंत खोदले. खोलवर बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने खोदकामावरील खर्च वाया जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली असून सिंचनासाठीही पाणी नसल्याने बागायती पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.जायकवाडीचे पाणी मिळाल्यास टंचाई होईल शिथिल४पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातून गेला आहे. दोन महिन्यांपूर्वी या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे टंचाई शिथिल झाली होती;परंतु, आता परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.४या प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा कालव्याला सोडले तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. शिवाय कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढून विहिरी, हातपंपांना पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी