शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

परभणी : परतीच्या पावसाने सात गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:40 IST

तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्केसोनपेठ (परभणी): तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले.एकीकडे केंद्र व राज्य शासन ग्रामस्थांना दळण-वळणाच्या सेवा व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करीत आहे. ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत.दुसरीकडे मात्र शेळगाव येथून वाहणाऱ्या फाल्गुनी नदीला २१ आॅक्टोबर रोजी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे हे पाणी शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून वाहत होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांतील ग्रामस्थांना सोनपेठ शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना पायी व वाहनातून मार्ग काढावा लागला. शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. थोडासा पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी तालुक्यातील उक्कडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांचा वारंवार संपर्क तुटतो. हा पूल नव्याने उभारावा, यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे; परंतु, या मागणीचा विचार होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ेसात : गावांचा निवडणुकीवर बहिष्कार४सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील सात गावांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील अरूंद पुलावरून पाणी आल्याने सात गावांचा सोनपेठ शहराशी संपर्क तुटला.४विशेष म्हणजे या सर्व गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा तालुका, जिल्हा प्रशासनाकडे रस्त्याच्या प्रश्नासाठी साकडे घातले; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील सात गावांतील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केलेच नाही.ग्रामस्थांत तीव्र संताप४सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. सात गावांतील ग्रामस्थांना पावसाळ्यातील चार महिने शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलामुळे गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस