शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

परभणी : परतीच्या पावसाने सात गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:40 IST

तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्केसोनपेठ (परभणी): तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले.एकीकडे केंद्र व राज्य शासन ग्रामस्थांना दळण-वळणाच्या सेवा व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करीत आहे. ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत.दुसरीकडे मात्र शेळगाव येथून वाहणाऱ्या फाल्गुनी नदीला २१ आॅक्टोबर रोजी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे हे पाणी शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून वाहत होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांतील ग्रामस्थांना सोनपेठ शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना पायी व वाहनातून मार्ग काढावा लागला. शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. थोडासा पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी तालुक्यातील उक्कडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांचा वारंवार संपर्क तुटतो. हा पूल नव्याने उभारावा, यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे; परंतु, या मागणीचा विचार होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ेसात : गावांचा निवडणुकीवर बहिष्कार४सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील सात गावांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील अरूंद पुलावरून पाणी आल्याने सात गावांचा सोनपेठ शहराशी संपर्क तुटला.४विशेष म्हणजे या सर्व गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा तालुका, जिल्हा प्रशासनाकडे रस्त्याच्या प्रश्नासाठी साकडे घातले; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील सात गावांतील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केलेच नाही.ग्रामस्थांत तीव्र संताप४सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. सात गावांतील ग्रामस्थांना पावसाळ्यातील चार महिने शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलामुळे गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस