शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘कृषी संजीवनी’साठी ११ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:56 IST

महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व योजनांचा एकत्रिकरणाचा आराखडा तयार करून विकासकामे होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व योजनांचा एकत्रिकरणाचा आराखडा तयार करून विकासकामे होणार आहेत.महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्र्रकल्पांतर्गत ‘पोकरा’ गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी गाव निवड करण्याचे धोरण निश्चित केले आहे. पाथरी तालुक्यातील हादगाव बु., वरखेड, किन्होळा, खेर्डा, सारोळा, रेणाखळी, वडी, बांदरवाडा, देवनांद्रा, निवळी, पाटोदा या ११ गावांची पोकरा प्रकल्पामध्ये निवड करण्यात आली. या गावांमध्ये सरपंचाच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समिती काम करणार असून कृषी, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान या प्रकल्पात राहणार आहे. हवामान आधारित या प्रकल्पाचे काम चालणार असून पाणलोट, ढाळी बांध, सिंचन विहीर, विहीर पूनर्भरण, कुक्कुट पालन, शेळी पालन, मच्छ पालन यासह विविध योजना एकत्रित करून त्याचा वैयक्तिक व सामूहिक लाभ या दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करून या आराखड्याला या प्रकल्पांतर्गत मंजुरी देण्यात येणार आहे. हा प्रकल्प पाच वर्ष चालणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे या ठिकाणी केली जाणार आहेत.इतर गावांचा समावेश करण्यासाठी प्रयत्नगावांचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महत्त्वपूर्ण असून नियोजनपूर्वक या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. पाथरी तालुक्यातील इतर गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार