शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

परभणी : कीटकनाशक विषबाधेचा वीस दिवसांत दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:12 IST

खरीप हंगामातील पिकांवर कीटकनाशक फवारताना जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी व सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील दोन शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने मृत्यू ओढावला आहे; परंतु, एकामागून एक मृत्यूची घटना घडत असताना कृषी विभागाकडून मात्र फवारणी विषयी कोणतीच जनजागृती करण्यात येत नसल्याने हा विभाग सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. माहितीच्या अभावामुळे शेतकरी असुरक्षित असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पिकांवर कीटकनाशक फवारताना जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी व सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील दोन शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने मृत्यू ओढावला आहे; परंतु, एकामागून एक मृत्यूची घटना घडत असताना कृषी विभागाकडून मात्र फवारणी विषयी कोणतीच जनजागृती करण्यात येत नसल्याने हा विभाग सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. माहितीच्या अभावामुळे शेतकरी असुरक्षित असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.फवारणी करताना दोन ते तीन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरु झाले होते. फवारणी विषयीची तंत्रशुद्ध माहिती नसल्याने शेतकºयांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घटना राज्यभर गाजल्यानंतर शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढून कृषी विभागातील अधिकाºयांनी गावागावात जाऊन फवारणी कशी करावी आणि फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातील कृषी विभागात दिसून येत आहे. कृषी विभागाने यावर्षी राज्य शासनाच्या आदेशाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पिकांना कीटकनाशक व रोगराईपासून बचावासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते; परंतु, फवारणी कशी करावी, याबाबत कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात घडलेला प्रकार परभणी जिल्ह्यात घडू पाहतो की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत कृषी विभागातील अधिकाºयांनी वरातीमागून घोडे दमटत अर्ध्याहून अधिक फवारणी संपत आल्यानंतर जनजागृतीस सुरुवात केली. जिल्ह्यात ८४८ गावे असल्याने मे महिन्यापासून कृषी विभागाने फवारणीविषयी जनजागृती करणे अपेक्षित होते; परंतु, तसे झाले नाही. २४ आॅगस्ट रोजी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेतकरी कापूस फवारणी करीत असताना कीटकनाशक अंगावर पडल्याने त्याचा प्रभाव होऊन अण्णासाहेब रामजी जीवणे यांचा २४ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे आता कृषी विभागाच्या जनजागृतीचा प्रश्न ऐरणीवर आला.किमान कौसडी येथील घटना घडल्यानंतर कृषी विभाग कीटकनाशकाची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकºयांमध्ये जाऊन प्रभावीपणे जनजागृती करेल, अशी अपेक्षा होती; परंतु, क्रॉप सॅप व कागदोपत्री मेळावे घेऊन आम्ही जनजागृती करीत आहोत, हे दाखवत जनजागृतीला फाटा दिला.या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील नितीन महादेव गजमल (२१) हा तरुण शेतकरी शेतामध्ये फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने १४ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २० दिवसांत दोन शेतकºयांचा बळी गेला; परंतु, दुसºया घटनेनंतरही कृषी विभाग सुस्तच असल्याचे दिसून येत आहे.विभागीय कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी याकडे लक्ष देऊन फवारणी विषयीची जनजागृती हा कार्यक्रम जिल्ह्यात प्राधान्याने राबवावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.शिंदे टाकळी : शेतकरी विषबाधेने मृत्यूमुखी४पिकांवरील अळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करत असताना विषबाधा झालेल्या एका २१ वर्षीय तरुण शेतकºयाचा १४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती.४तालुक्यातील शिंदे टाकळी येथील नितीन महादेवराव गजमल (२१) हा तरुण शेतकरी आपल्या शेतातील कापसावर १४ सप्टेंबर रोजी फवारणी करीत होता. त्याला अचानक त्रास होऊ लागल्याने सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु, येथे उपचार झाले नाहीत.४ परभणी येथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नितीन यास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते; परंतु, १४ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. शिंदे टाकळी येथे १५ सप्टेंबर रोजी नितीन गजमल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे.कृषी विभाग खाजगी कंपनीच्या भरोस्यावर४जिल्ह्यातील शेतकºयांना फवारणीची माहिती देण्यासाठी गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनी या खाजगी कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून फवारणी संदर्भातील माहिती शेतकºयांना दिली जात आहे. ही कंपनी जनजागृतीसाठी नियुक्त केली असली तरी कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. विशेष म्हणजे एकच चित्ररथ जिल्ह्यात फिरवला जात आहे. कृषी विभागातील अधिकाºयांकडून फवारणीसाठी गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याने शेतकºयांसमोर असुरक्षितता निर्माण झाली आहे.दीड महिन्यात ३३ जणांवर उपचार४पिकांवर फवारणी करीत असताना कीटकनाशकामुळे चक्कर, मळमळ, अंगाला खाज येणे, घाम येणे, डोळे लाल होणे असे प्रकार सेलू तालुक्यातील फवारणी करणाºया शेतकºयांवर आढळून आले आहेत.४दीड महिन्यात सेलू उपजिल्हा रुग्णालयात या प्रकारचे ३३ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील सहा रुग्णांना परभणीत पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर उर्वरित रुग्णांवर उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी दिली.महिनाभरापूर्वी सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथे शेतकºयांना फवारणी संदर्भात तालुका कृषी कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून जनजागृती सुरु आहे.- अनंत कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सेलूमी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा कृषी अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला आहे. या संदर्भात माहिती घेतो.-संतोष आळसे, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी