शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : धान्य घोटाळ्याचा तपास पडला अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:09 IST

येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात आॅगस्ट २०१६ मध्ये २८ कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्या प्रकरणी ३७ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला होता़ या प्रकरणातील २३ आरोपींना अटक करण्यात आली़ या सर्व आरोपींना जामीनही मिळालेला आहे़ उर्वरित आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला असून, १४ पैकी ९ आरोपी हे शासकीय अधिकारी आहेत़ तर खाजगी पाच आरोपी आहेत़ ८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौºयाच्या वेळी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यात वाद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पानसरे यांनी इतर अधिकाºयांना सोपविण्याची विनंती विशेष पोलीस महानिरीक्षकांना केली होती़ त्यानुसार हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांना हे प्रकरण तपासासाठी आॅक्टोबर महिन्यात सोपविण्यात आले़ त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांपासून गुंजाळ यांनी या प्रकरणात एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी आहे़ तर परभणीतील एक बडा उद्योजक आहे़ या खाजगी आरोपींना अटक करण्याबाबत गुंजाळ यांना काय अडचण येत आहे? हे समजत नाही़ परभणीहून हिंगोलीकडे तपास वर्ग झाल्यानंतर या तपासाला गती येईल, अशी परभणीकरांची अपेक्षा होती़ परंतु, गुंजाळ यांनी ही अपेक्षा पूर्णत: फोल ठरविली आहे़ विशेष म्हणजे तब्बल दीड वर्षांचा कालावधी या प्रकरणाला झाल्यानंतरही एकही संघटना या विरोधात आता बोलत नाही़ परिणामी या प्रकरणातील आरोपी आता उजळमाथ्याने फिरत आहेत़ शिवाय शासकीय सेवेतील निलंबित झालेले अधिकारी सेवेत पुनर्रस्थापित झाले आहेत. तर अन्य आरोपी शासकीय पगार घेऊन आरामात नोकरी करीत आहेत़वरिष्ठ अधिकाºयांनीही दिले आरोपींना अभयपरभणीच्या धान्य घोटाळ्यात दोन उपजिल्हाधिकाºयांसह तब्बल ९ शासकीय अधिकारी व कर्मचारी आरोपी आहेत़ यातील उपजिल्हाधिकारी कच्छवे व तहसीलदार रुईकर यांना निलंबित करण्यात आले होते़ ते आता शासकीय सेवेत परतले आहेत़ इतर आरोपींबाबतचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अहवाल सादर करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनही या अधिकाºयांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे़ शिवाय पोलीसही या आरोपींना अटक करीत नाहीत़