शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

परभणी : संजय गांधी योजनेचा विभाग झाला निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:51 IST

येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाला १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने अर्ज घेऊन येणाऱ्या वृद्धांना माघारी फिरावे लागत आहे. हा विभाग निराधार झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाला १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने अर्ज घेऊन येणाऱ्या वृद्धांना माघारी फिरावे लागत आहे. हा विभाग निराधार झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दुसरीकडे आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेतील हजारावर प्रकरणे मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. आचारसंहितेमुळे या संबंधी बैठक होत नसल्याने वृद्ध निराधार लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने वृद्ध त्रस्त झाले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विशेष योजनेंर्गत निराधार घटकासाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या, इंदिरा गांधी राष्टÑीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्टÑीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वृद्ध मोठ्या प्रमाणावरे अर्ज करतात. मागील तीन महिन्यांपासून ५०० च्या वर प्रस्ताव निराधारांनी दाखल केले आहेत. मात्र तहसील कार्यालयाकडून प्रस्तावाचा निपटारा होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे निराधारांना आर्थिक फटक्यासह त्रास सहन करावा लागत आहे. तसेच संजय गांधी निराधार विभागाला मागील १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने या विभागाचे काम ठप्प झाले आहे. मागील प्रस्ताव धुळखात पडले असताना नवीन प्रस्ताव दाखल करण्यासाठी येणाºया वृद्धांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने अर्जदारातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विभागाला एस.एम. स्वर्णकार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांची बदली मानवत तहसील कार्यालयात झाली मात्र अद्यापही या विभागाला कर्मचारी न मिळाल्याने कामकाज बंद पडले आहेआचारसंहितेचा : बसला फटका४संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या व इंदिरा गांधी राष्टÑीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्टÑीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्टÑीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी शेकडो अर्जदारांनी अर्ज केले आहेत. मात्र मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागली होती.४२६ मे रोजी आचारसंहिता संपली होती. निराधारांचे प्रस्ताव मार्गी लागतील, अशी आशा होती. मात्र त्यातच नगरपालिकाची पोटनिवडणूक असल्याने आचारसंहिता सुरु झाली आहे. २४ जूनला मतमोजणी होणार असून आचारसंहिता संपणार आहे, यानंतर बैठकीचे आयोजन करून अर्जाचा निपटारा करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार डी.डी. फुफाटे यांनी दिली.संजय गांधी निराधार योजनेसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाºयाची बदली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन कर्मचारी उपलब्ध झाले असून या पैकी एका कर्मचाºयाकडे तातडीने हा विभाग देण्यात येणार आहे.-डी.डी. फुफाटे, तहसीलदार मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार