शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

परभणी :माथाडी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:42 IST

येथील किराणा असोसिएशनचे काही व्यापारी हमाल कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील किराणा असोसिएशनचे काही व्यापारी हमाल कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. किराणा व्यापारी असोसिएशनकडे यापूर्वी २२ डिसेंबर रोजी दरवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी कामगारांचा प्रश्न सुटावा, या उद्देशाने कामगारांनी माघार घेतली होती. मात्र त्यानंतर किराणा असोसिएशनने कामगारांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना जाणूनबुजून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कच्छी बाजार भागात २० वर्षांपासून हमाल कामगार काम करतात. या कामगारांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे. कमी दरामध्ये जास्त काम करुन घेत कामगारांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.व्यापारी असोसिएशनकडे दरवाढी संदर्भात वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु, व्यापाºयांनी दरवाढ तर केलीच नाही. शिवाय दरवाढ मागितल्यास बाहेरील कामगार कामावर घेऊ, अशी धमकी देण्यात आली.या सर्व बाबी लक्षात घेऊन माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने दरवाढीच्या मागणीसाठी २२ जानेवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना हे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर मराठवाडा हमाल माथाडी युनियनचे कॉ.राजन क्षीरसागर, शेख अब्दुल, परभणी जिल्हा मजदूर युनियनचे कॉ.विलास बाबर, शेख महेबूब, एकता हमाल युनियनचे कॉ. रोहिदास नेटके आणि हमाल माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.