शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

परभणी : ६८२ कोटी रुपये खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:40 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर २३ जानेवारीपर्यंत ६८२ कोटी २९ लाख रुपय वर्ग करण्यात आले आहेत़

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर २३ जानेवारीपर्यंत ६८२ कोटी २९ लाख रुपय वर्ग करण्यात आले आहेत़राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती़ त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले़ परंतु, शासनाच्या अनेक निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़ शासनाच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवर पुर्वी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची ग्रीन लिस्ट टाकण्यात येत होती़ परंतु, नंतर तीही बंद करण्यात आली़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांच्या नजरा ग्रीन लिस्टकडे लागल्या होत्या़ या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यातील शेतकरी अडचला होता़त्यानंतर शासनाकडून जिल्हा बँक, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना पात्र लाभार्थी शेतकºयांच्या ग्रीन लिस्ट याद्या प्राप्त झाल्या़ त्यानुसार २३ जानेवारपर्र्यंत जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर ६८२ कोटी २९ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत़ उर्वरित शेतकºयांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे़यासाठीची काही रक्कम जिल्ह्याला मिळालेली आहे़ शेतकºयांच्या कर्ज खात्याच्या माहितीतील त्रुटी तसेच अर्जांमध्ये असलेल्या अपुºया माहितीमुळे कर्जखात्यात रक्कम वर्ग करण्यास बँकांना अडचणी येत आहेत़ त्यामुळे या अडचणी दूर करून येत्या काही दिवसांत उर्वरित शेतकºयांच्या खात्यावर कर्जमार्फीची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून ‘लोकमत’ला देण्यात आली़एसबीआयकडे : ४४१ कोटींची रक्कम वर्गजिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर शासनाने ६८२ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने २९ हजार ८१४ शेतकºयांच्या खात्यावर ४५ कोटी २७ लाख, इलाहाबाद बँकेने २ हजार ५ शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी २७ लाख, आंध्रा बँकेने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ६० लाख, अ‍ॅक्सीस बँकेने १ शेतकºयाच्या खात्यावर १४ हजार, बँक आॅफ बडोदा बँकेने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी १ लाख, बँक आॅफ इंडियाने १० शेतकºयांच्यावर २ लाख ५० हजार, बँक आॅफ महाराष्ट्राने ६ हजार १९९ शेतकºयांच्या खात्यावर ४४ कोटी १९ लाख १९ हजार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १७ हजार ७०३ शेतकºयांच्या नावे १०४ कोटी ६७ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियाने ६४ हजार ६७२ शेतकºयांच्या नावे ४४१ कोटी १२ लाख अशी कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे़शेतकºयांना मिळेना माहितीराज्य शासनाने प्रत्येक शेतकºयाची दीड लाखांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १९४ शेतकºयांसाठी ६९६ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली़ त्यातील ९९ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्गही करण्यात आली़ परंतु, बहुतांश शेतकºयांना आपले कर्जमाफ झाले की नाही, याची माहिती मिळेनाशी झाली आहे़ त्यामुळे कर्जमाफ होवूनही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी संभ्रमात आहेत़