शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

परभणी : ६ वर्षांपासून रखडला पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:43 IST

शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.सोनपेठ येथून नाथरा मार्गे अंबाजोगाईला जोडणाºया सोनपेठ शहरातील वाण नदीवर २०१३ मध्ये पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र या पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. ते काम पूर्ण करण्यासाठी २ वर्षाची मुदत देण्यात आली होती. तरीही संबंधित काम अर्धवट अवस्थेत आहे. परिसरातील नागरिकांना अर्धवट कामामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सोनपेठ- नाथरा- अंबाजोगाई हा मार्ग पूर्ण झाल्यास गवळी पिंपरी, खपाट पिंपरी, निमगाव, डिघोळ व नाथरा येथील नागरिकांना सोनपेठ ते अंबाजोगाई हे अंतर १० कि.मी. ने कमी होणार आहे. तसेच शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास या शेतकºयांंना शेतात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे हा पूल पूर्ण झाल्यास व त्यापुढील रस्त्याचे काम झाल्यास तालुक्यातील नागरिकांचा अंबाजोगाईला जाण्यासाठी पैसा व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या रखडलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, पुलाच्या कामासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. बांधकामाला दोन वर्र्षाची मुदतही मिळाली; परंतु, अधिकाºयांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे या पुलाचे काम रखडले आहे.या पुलाच्या कामाला २०१३ मध्ये सुरूवात झाली; परंतु, निधीच्या कमतरतेमुळे हे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल.-संजय बंडे,उपविभागीय शाखा अभियंता, सोनपेठ

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीroad transportरस्ते वाहतूक