शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

परभणी : ६ वर्षांपासून रखडला पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:43 IST

शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.सोनपेठ येथून नाथरा मार्गे अंबाजोगाईला जोडणाºया सोनपेठ शहरातील वाण नदीवर २०१३ मध्ये पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र या पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. ते काम पूर्ण करण्यासाठी २ वर्षाची मुदत देण्यात आली होती. तरीही संबंधित काम अर्धवट अवस्थेत आहे. परिसरातील नागरिकांना अर्धवट कामामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सोनपेठ- नाथरा- अंबाजोगाई हा मार्ग पूर्ण झाल्यास गवळी पिंपरी, खपाट पिंपरी, निमगाव, डिघोळ व नाथरा येथील नागरिकांना सोनपेठ ते अंबाजोगाई हे अंतर १० कि.मी. ने कमी होणार आहे. तसेच शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास या शेतकºयांंना शेतात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे हा पूल पूर्ण झाल्यास व त्यापुढील रस्त्याचे काम झाल्यास तालुक्यातील नागरिकांचा अंबाजोगाईला जाण्यासाठी पैसा व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या रखडलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, पुलाच्या कामासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. बांधकामाला दोन वर्र्षाची मुदतही मिळाली; परंतु, अधिकाºयांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे या पुलाचे काम रखडले आहे.या पुलाच्या कामाला २०१३ मध्ये सुरूवात झाली; परंतु, निधीच्या कमतरतेमुळे हे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल.-संजय बंडे,उपविभागीय शाखा अभियंता, सोनपेठ

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीroad transportरस्ते वाहतूक