शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

परभणी : ६ वर्षांपासून रखडला पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:43 IST

शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.सोनपेठ येथून नाथरा मार्गे अंबाजोगाईला जोडणाºया सोनपेठ शहरातील वाण नदीवर २०१३ मध्ये पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र या पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. ते काम पूर्ण करण्यासाठी २ वर्षाची मुदत देण्यात आली होती. तरीही संबंधित काम अर्धवट अवस्थेत आहे. परिसरातील नागरिकांना अर्धवट कामामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सोनपेठ- नाथरा- अंबाजोगाई हा मार्ग पूर्ण झाल्यास गवळी पिंपरी, खपाट पिंपरी, निमगाव, डिघोळ व नाथरा येथील नागरिकांना सोनपेठ ते अंबाजोगाई हे अंतर १० कि.मी. ने कमी होणार आहे. तसेच शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास या शेतकºयांंना शेतात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे हा पूल पूर्ण झाल्यास व त्यापुढील रस्त्याचे काम झाल्यास तालुक्यातील नागरिकांचा अंबाजोगाईला जाण्यासाठी पैसा व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या रखडलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, पुलाच्या कामासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. बांधकामाला दोन वर्र्षाची मुदतही मिळाली; परंतु, अधिकाºयांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे या पुलाचे काम रखडले आहे.या पुलाच्या कामाला २०१३ मध्ये सुरूवात झाली; परंतु, निधीच्या कमतरतेमुळे हे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल.-संजय बंडे,उपविभागीय शाखा अभियंता, सोनपेठ

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीroad transportरस्ते वाहतूक