शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

परभणी : १२ कोटी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:10 IST

शहराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८ वर्षापूर्वी प्राप्त झालेले १२ कोटी रुपये नियोजन विभागाने परत मागविले आहेत़ विशेष म्हणजे हा निधी जिल्ह्यातच खर्च करण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न झाला होता़ मात्र लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामांची यादीच न दिल्याने चार महिन्यांची प्रतीक्षा करून अखेर हे पैसे परत करण्याचे आदेश शासनाच्या नियोजन विभागाच्या उपसचिवांनी काढले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८ वर्षापूर्वी प्राप्त झालेले १२ कोटी रुपये नियोजन विभागाने परत मागविले आहेत़ विशेष म्हणजे हा निधी जिल्ह्यातच खर्च करण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न झाला होता़ मात्र लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामांची यादीच न दिल्याने चार महिन्यांची प्रतीक्षा करून अखेर हे पैसे परत करण्याचे आदेश शासनाच्या नियोजन विभागाच्या उपसचिवांनी काढले आहेत़परभणी शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी २०११-१२ मध्ये बाह्य वळण रस्त्यासाठी नियोजन समितीने १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता़ हा निधी भूसंपादनाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला होता़ मात्र त्या वर्षात हा निधी खर्च झाला नाही़ त्यामुळे कोषागार विभागाच्या पीएलए खात्यात निधी पडून होता़ नियोजन विभागाचा निधी सर्वसाधारणपणे वर्षभरात खर्च करणे अपेक्षित असते़ अखर्चित निधी नियोजन विभागाला परत करावा लागतो़ मात्र जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आलेला १२ कोटी रुपयांचा हा निधी जिल्ह्यातच इतर विकास कामांसाठी वापरावा, अशी मागणी पुढे आली आणि हा निधी इतर कामांसाठी वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले़ शासनस्तरावरून सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला़ या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर निधी इतर ठिकाणी वापरण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला़पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही हा निधी जिल्ह्यासाठी मिळावा, अशी भूमिका घेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली़ २५ सप्टेंबर २०१८ रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून १२ कोटी रुपयांचा निधी इतर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती़ त्यावर अर्थमंत्र्यांनी त्यास मंजुरीही दिली होती़ त्यानुसार हा अखर्चित १२ कोटी रुपये खर्च करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची यादी द्या़ त्यानुसार निधी वितरित केला जाईल, अशी भूमिका घेतली़ त्यानंतर लोकप्रतिनिधींनीही बैठक घेऊन या निधीसाठी चर्चा केली; परंतु, विकास कामांची यादी देताना लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राहिला नाही आणि ही यादीच नियोजन विभागापर्यंत पोहचली नाही़ परिणामी चार महिन्यांची प्रतीक्षा केल्यानंतर नियोजन विभागाचे उप सचिव व्ही़एफ़ वसावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अखर्चित राहिलेला हा निधी तातडीने शासनाच्या कोषागार निधीमध्ये जमा करावा, असे आदेश दिले आहेत़जिल्ह्याला मिळालेला १२ कोटी रुपयांचा निधी परत न जाता तो इतर विकास कामांना वापरता यावा, यासाठी तब्बल ८ वर्षांपासून पाठपुरावा करण्यात आला़ मात्र अखेर ८ वर्षे सांभाळलेला हा निधी कुठल्याही विकास कामाविना शासनाच्या खात्यावर जमा करण्याची नामुष्की जिल्ह्यावर ओढावली आहे़महापालिकेचा निधीही मागविला परतजिल्हा नियोजन समितीने २०१६-१७ मध्ये नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सुरक्षा उपकरणांसाठी परभणी महापालिकेला ७५ लाख रुपयांचा निधी दिला होता़ तर २०१७-१८ मध्ये स्मार्ट ट्रिट लाईट सिस्टीम बसविण्यासाठी २ कोटी १३ लाख ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता़ मात्र महापालिकेने हा निधी वेळेत खर्च केला नाही़ शासनाच्या निर्णयानुसार दोन वर्षांच्या आत हा निधी खर्च करणे अपेक्षित होते़ या निधीसंदर्भातही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष बाब म्हणून निधी खर्चाची परवानगी मागविली होती़ मात्र हा निधीही शासन खाती जमा करण्याचे आदेश नियोजन विभागाने दिला असून, हा निधी शिल्लक ठेवणाºया अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याचे आदेशात म्हटले आहे़जिल्ह्याला मिळालेला १२ कोटी रुपयांचा हा निधी विशेष बाब म्हणून इतर विकास कामांसाठी द्यावा, यासाठी शासन दरबारी हा प्रश्न लावून धरला़ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही या निधीसाठी पाठपुरावा केला़ त्यामुळेच पाच वर्षापूर्वी परत जाणारा हा निधी थांबविला होता़ अलीकडच्या काळात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घालून हा निधी जिल्ह्याला मिळावा म्हणून प्रयत्न केले होते़ हा निधी जिल्ह्यात इतर विकास कामांसाठी खर्च झाला असता तर विकास कामेच मार्गी लागली असती़ परंतु, नियोजन विभागाने तो परत मागविल्याने आर्थिक नुकसान झाले आहे़-प्रवीण देशमुख, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी