शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परभणी : वाळुची लिलाव प्रक्रिया बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:02 IST

वाळू घाटांच्या लिलावास दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील वाळू टंचाईचे संकट गडद झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाळू घाटांच्या लिलावास दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील वाळू टंचाईचे संकट गडद झाले आहे़जिल्ह्यामधील वाळू घाटांची आॅगस्ट महिन्यात नियमित लिलाव प्रक्रिया होत असते; परंतु, विविध कारणांमुळे ही प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून झालेली नाही़ त्यामुळे अवैध मार्गाने जिल्ह्यात वाळू उपसा सुरू आहे़ परिणामी वाळू टंचाई निर्माण झाली असून, तीन ब्रास वाळुला नागरिकांना जवळपास २२ ते २५ हजार रुपये काळ्या बाजारात मोजावे लागत आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती़ त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या अनुषंगाने ११ ते २६ डिसेंबर दरम्यान, ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती़ त्यानुसार यासाठी आॅनलाईन निविदा दाखल करण्यास सुरुवातही झाली होती़ परंतु, दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने या संदर्भात ११ डिसेंबर रोजी महसूल विभागाला आदेश दिला़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी ही ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ आता पुढील निर्णय कधी होईल, हे मात्र जाहीर करण्यात आलेले नाही़ त्यामुळे वाळू टंचाईत भर पडण्याची शक्यता आहे़ शिवाय खाजगी आणि शासकीय बांधकामांवर याचा परिणाम होणार आहे़लिलाव प्रक्रियेंतर्गत गोदावरी नदीतील २५, दूधना नदीतील ५ आणि पूर्णा नदीतील २ अशा एकूण ३२ वाळू घाटांचा लिलाव प्रशासनाने जाहीर केला होता़ त्यामध्ये सर्वाधिक किंमत गोदावरी नदीपात्रातील वाळू घाटाच्या लिलावाला ठेवण्यात आली होती़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू