शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कापसाचे दर वाढले अन् उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:25 IST

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.पालम तालुक्यात यावर्षी कापसाच्या लागवडीत घट झाली आहे. मागील वर्षी बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी शेतकºयांनी पिकाकडे पाठ फिरविली आहे. जेमतेम १० हजार हेक्टवर कापूस पिकाची लागवड झाली होती. सुुरुवातीला पिकांची स्थिती जोमदार होती. मात्र तालुक्यात २० आॅगस्टपासून जवळपास दोन महिने पावसाचा खंड पडल्याने कापूस पीक सुकू लागले. तसेच मर रोगाची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची झाडे वाळून गेली.पावसाअभावी कापूस पिकावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने पिके उगवलीच नाहीत. कापसाला ६ हजार रुपयांपासून प्रती क्विंटल भाव मिळत आहे; परंतु, कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.त्यामुळे शेतकºयांकडे कापूसच नाही. दुष्काळात पिकांनी साथ सोडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे भावात वाढ झाली असली तरी उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याने पालम तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.पीक विम्याची : शेतकºयांना आशा४खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. शेतकºयांनी कापूस पिकावर हजारो रुपये खर्च करून पीक विमा उतरविला आहे. यावर्षी हे पीक हातून गेले आहे. त्यामुळे पीक विमा संरक्षण मिळणे गरजेचे असून शेतकºयांना विम्याची आशा आहे. कंपनी, सरकारी अधिकारी काय कागदी घोडे नाचवितील, याची भिती शेतकºयांतून व्यक्त केली जात आहे.नुकसानीचीदखल घेतली नाही४कापूस पिकावर मर रोग व बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी कापसाचे पीक उधद्वस्त झाले आहे. शेतकरी नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी करीत आहेत;परंतु, शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकºयांना वाईट दिवस आले आहेत. निसर्गाने झटका दिलेल्या शेतकºयांना शासनानेही वाºयावर सोडल्याची स्थिती दिसून येत आहे.४त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना नुकसानीनुसार भरपाई द्यावी, अशी मागणी पालम तालुक्यातील शेतकºयांच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी