शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

परभणी : कापसाचे दर वाढले अन् उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:25 IST

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.पालम तालुक्यात यावर्षी कापसाच्या लागवडीत घट झाली आहे. मागील वर्षी बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी शेतकºयांनी पिकाकडे पाठ फिरविली आहे. जेमतेम १० हजार हेक्टवर कापूस पिकाची लागवड झाली होती. सुुरुवातीला पिकांची स्थिती जोमदार होती. मात्र तालुक्यात २० आॅगस्टपासून जवळपास दोन महिने पावसाचा खंड पडल्याने कापूस पीक सुकू लागले. तसेच मर रोगाची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची झाडे वाळून गेली.पावसाअभावी कापूस पिकावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने पिके उगवलीच नाहीत. कापसाला ६ हजार रुपयांपासून प्रती क्विंटल भाव मिळत आहे; परंतु, कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.त्यामुळे शेतकºयांकडे कापूसच नाही. दुष्काळात पिकांनी साथ सोडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे भावात वाढ झाली असली तरी उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याने पालम तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.पीक विम्याची : शेतकºयांना आशा४खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. शेतकºयांनी कापूस पिकावर हजारो रुपये खर्च करून पीक विमा उतरविला आहे. यावर्षी हे पीक हातून गेले आहे. त्यामुळे पीक विमा संरक्षण मिळणे गरजेचे असून शेतकºयांना विम्याची आशा आहे. कंपनी, सरकारी अधिकारी काय कागदी घोडे नाचवितील, याची भिती शेतकºयांतून व्यक्त केली जात आहे.नुकसानीचीदखल घेतली नाही४कापूस पिकावर मर रोग व बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी कापसाचे पीक उधद्वस्त झाले आहे. शेतकरी नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी करीत आहेत;परंतु, शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकºयांना वाईट दिवस आले आहेत. निसर्गाने झटका दिलेल्या शेतकºयांना शासनानेही वाºयावर सोडल्याची स्थिती दिसून येत आहे.४त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना नुकसानीनुसार भरपाई द्यावी, अशी मागणी पालम तालुक्यातील शेतकºयांच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी