शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

परभणी : कापसाचे दर वाढले अन् उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:25 IST

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.पालम तालुक्यात यावर्षी कापसाच्या लागवडीत घट झाली आहे. मागील वर्षी बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी शेतकºयांनी पिकाकडे पाठ फिरविली आहे. जेमतेम १० हजार हेक्टवर कापूस पिकाची लागवड झाली होती. सुुरुवातीला पिकांची स्थिती जोमदार होती. मात्र तालुक्यात २० आॅगस्टपासून जवळपास दोन महिने पावसाचा खंड पडल्याने कापूस पीक सुकू लागले. तसेच मर रोगाची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची झाडे वाळून गेली.पावसाअभावी कापूस पिकावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने पिके उगवलीच नाहीत. कापसाला ६ हजार रुपयांपासून प्रती क्विंटल भाव मिळत आहे; परंतु, कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.त्यामुळे शेतकºयांकडे कापूसच नाही. दुष्काळात पिकांनी साथ सोडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे भावात वाढ झाली असली तरी उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याने पालम तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.पीक विम्याची : शेतकºयांना आशा४खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. शेतकºयांनी कापूस पिकावर हजारो रुपये खर्च करून पीक विमा उतरविला आहे. यावर्षी हे पीक हातून गेले आहे. त्यामुळे पीक विमा संरक्षण मिळणे गरजेचे असून शेतकºयांना विम्याची आशा आहे. कंपनी, सरकारी अधिकारी काय कागदी घोडे नाचवितील, याची भिती शेतकºयांतून व्यक्त केली जात आहे.नुकसानीचीदखल घेतली नाही४कापूस पिकावर मर रोग व बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी कापसाचे पीक उधद्वस्त झाले आहे. शेतकरी नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी करीत आहेत;परंतु, शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकºयांना वाईट दिवस आले आहेत. निसर्गाने झटका दिलेल्या शेतकºयांना शासनानेही वाºयावर सोडल्याची स्थिती दिसून येत आहे.४त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना नुकसानीनुसार भरपाई द्यावी, अशी मागणी पालम तालुक्यातील शेतकºयांच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी