शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मंत्रालयातील लोकशाही दिनात बंधाऱ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:23 IST

तालुक्यातील कंठेश्वर-निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाºयाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न स्थानिक ठिकाणच्या तीनही प्रक्रिया पूर्ण करून अखेर आता मंत्रालयातील लोकशाही दिनात दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : तालुक्यातील कंठेश्वर-निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाºयाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न स्थानिक ठिकाणच्या तीनही प्रक्रिया पूर्ण करून अखेर आता मंत्रालयातील लोकशाही दिनात दाखल झाला आहे.तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरात पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास सुरूवात होऊन दहा वर्षे झाली. अजूनही बंधाºयाचे काम अपूर्ण आहे. या कामाबाबत परिसरातील गावकऱ्यांनी आवाज उठवित हा प्रश्न तालुका, जिल्हा व विभागीय आयुक्तांच्या लोकशाही दिनात मांडला; परंतु, या कोल्हापुरी बंधाºयाचे रखडलेले काम काही केल्यास सुरु झाले नाही. त्यामुळे १३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील लोकशाही दिनासाठी मुंबई येथे मांडण्यात आला आहे.लोकशाही दिनातून शासन नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करीत असताना लोकशाही दिनाच्या तीन टप्प्यात या बंधाºयाच्या कामास गती मिळाली नाही. प्रत्येक वेळी काम होईल, अशी आशा असताना ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आली. बंधाºयाच्या रखडलेल्या बांधकामाबाबत ८ सप्टेंबर २०१७ रोजी पहिला अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रक्रियेसही दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. बंधाºयाचे काम जवळपास ७० टक्के झाले आहे. उर्वरित काम करण्यास कंत्राटदार तयार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने कोल्हापुरी बंधारा उभारण्यासाठी दिलेली मुदत उलटून गेली आहे. यासाठी परत नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी बंधाºयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या बंधाºयाच्या कामासाठी २००५-०६ मध्ये २ कोटी १० लाख ६३ हजार ९२३ रुपये या सुधारित किंमतीस मान्यता प्राप्त करण्यात आली. राज्यस्तरीय सल्लागार समितीने १५ डिसेंबर २०१५ रोजी ६६ व्या बैठकीत सुधारित प्रशासकीय अहवाल अंतिम करून महामंडळास सादर केला. त्यानंतर बंधाºयाच्या बांधकामाची सुधारित रक्कम ३ कोटी ५५ लाख ७४ हजार ८०० रुपयांपर्यंत केली गेली. या बंधाºयाच्या कामासाठी शासनाकडून वेळोवेळी सुधारित किंमत वाढवूनही हे काम रखडले आहे. बंधारा पूर्ण झाल्यास या भागातील ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. आता हा प्रश्न मंत्रालयाच्या लोकशाही दिनात मांडण्यात येणार असून ग्रामस्थांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या अर्जावर संजय कदम, दिगंबर सूर्यवंशी, लक्ष्मण वैद्य, पांडुरंग कदम, ओंंकार वमसतकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदी