शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

परभणी : मंत्रालयातील लोकशाही दिनात बंधाऱ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:23 IST

तालुक्यातील कंठेश्वर-निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाºयाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न स्थानिक ठिकाणच्या तीनही प्रक्रिया पूर्ण करून अखेर आता मंत्रालयातील लोकशाही दिनात दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : तालुक्यातील कंठेश्वर-निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाºयाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न स्थानिक ठिकाणच्या तीनही प्रक्रिया पूर्ण करून अखेर आता मंत्रालयातील लोकशाही दिनात दाखल झाला आहे.तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरात पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास सुरूवात होऊन दहा वर्षे झाली. अजूनही बंधाºयाचे काम अपूर्ण आहे. या कामाबाबत परिसरातील गावकऱ्यांनी आवाज उठवित हा प्रश्न तालुका, जिल्हा व विभागीय आयुक्तांच्या लोकशाही दिनात मांडला; परंतु, या कोल्हापुरी बंधाºयाचे रखडलेले काम काही केल्यास सुरु झाले नाही. त्यामुळे १३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील लोकशाही दिनासाठी मुंबई येथे मांडण्यात आला आहे.लोकशाही दिनातून शासन नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करीत असताना लोकशाही दिनाच्या तीन टप्प्यात या बंधाºयाच्या कामास गती मिळाली नाही. प्रत्येक वेळी काम होईल, अशी आशा असताना ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आली. बंधाºयाच्या रखडलेल्या बांधकामाबाबत ८ सप्टेंबर २०१७ रोजी पहिला अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रक्रियेसही दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. बंधाºयाचे काम जवळपास ७० टक्के झाले आहे. उर्वरित काम करण्यास कंत्राटदार तयार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने कोल्हापुरी बंधारा उभारण्यासाठी दिलेली मुदत उलटून गेली आहे. यासाठी परत नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी बंधाºयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या बंधाºयाच्या कामासाठी २००५-०६ मध्ये २ कोटी १० लाख ६३ हजार ९२३ रुपये या सुधारित किंमतीस मान्यता प्राप्त करण्यात आली. राज्यस्तरीय सल्लागार समितीने १५ डिसेंबर २०१५ रोजी ६६ व्या बैठकीत सुधारित प्रशासकीय अहवाल अंतिम करून महामंडळास सादर केला. त्यानंतर बंधाºयाच्या बांधकामाची सुधारित रक्कम ३ कोटी ५५ लाख ७४ हजार ८०० रुपयांपर्यंत केली गेली. या बंधाºयाच्या कामासाठी शासनाकडून वेळोवेळी सुधारित किंमत वाढवूनही हे काम रखडले आहे. बंधारा पूर्ण झाल्यास या भागातील ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. आता हा प्रश्न मंत्रालयाच्या लोकशाही दिनात मांडण्यात येणार असून ग्रामस्थांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या अर्जावर संजय कदम, दिगंबर सूर्यवंशी, लक्ष्मण वैद्य, पांडुरंग कदम, ओंंकार वमसतकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदी